POK तील आंदोलकांसमोर पाक सरकारने टेकले गुडघे

    14-May-2024
Total Views | 51

POK

 

श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (JAAC) ने महागाई आणि इतर मुद्द्यांवर पुकारलेला संप मागे घेतला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालू असलेल्या अनेक दिवसांच्या हिंसाचार आणि संघर्षानंतर, जेएएसीने मंगळवार, दि. १४ मे २०२४ आपला संप मागे घेण्याची घोषणा केली. निदर्शनांदरम्यान पीओकेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत.
 
पाकिस्तानी लष्कराकडून आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर अनेक भागात मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. पाकिस्तानी माध्यामांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी JAAC च्या बहुतांश मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासोबतचं पाकव्याप्त काश्मीरसाठी २४ अब्ज रुपयांचे विशेष अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
 
वाढती महागाई आणि पाकिस्तान सरकारच्या दडपशाही विरोधात पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेकडून आंदोलन करण्यात येत होते. आंदोलकांनी भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त करणारे बॅनर्स सुद्धा यादरम्यान झळकावले होते. आंदोलन थांबण्यासाठी पाकिस्तान सरकारने दडपशाही करत ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण, यामध्ये हिंसक झालेल्या आंदोलकांनी पाकिस्तानी पोलिसांना मारहाण केली. त्यामुळे आंदोलन अधिकचं हिंसक झाले होते.
 
पाकिस्तानमधील शाहबाज सरकारला आंदोलन थांबण्यात यश आले असले तरी आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा भडका पुन्हा उठू शकतो. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आमचे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घडणाऱ्या घटनांवर लक्ष असून योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ असं वक्तव्य केले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121