समुद्राकडे तोंड करत वसंत तात्या म्हणतात, "माझ्या पुण्याच्या..."

    18-Mar-2024
Total Views | 420

Vasant More


मुंबई :
वसंत मोरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिल्यानंतर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत एक सूचक कॅप्शनही त्यांनी लिहीले आहे. त्यांचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 
 
 
ज्या पक्षात १८ वर्षे काम केलं त्या मनसे पक्षाचा नुकताच वसंत मोरेंनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता ते कोणत्या पक्षात जाणार अशा चर्चा सुरु असताना त्यांचा एक फोटो पुढे आला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर समुद्राकडे तोंड करुन उभे असलेला एक फोटो पोस्ट केला असून या फोटोला 'एक नवी दिशा जी माझ्या पुण्याच्या हिताची असेल' असं कॅप्शन दिलं आहे.
 
हे वाचलंत का? -  'इंडी' आघाडीत सगळेच इंजिन, बोगी नाहीच!
 
दुसरीकडे, वसंत मोरेंना पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची ईच्छा आहे. राजीनाम्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव ठाकरे या तीन पक्षांकडून प्रवेशासाठी ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय वसंत मोरेंनी शरद पवार आणि संजय राऊतांची भेटही घेतली आहे. त्यानंतर आता त्यांनी हा फोटो शेअर केल्याने ते खरंच एखाद्या पक्षात प्रवेश करतील का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तसेच लोकसभेसाठी त्यांना नेमकी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.
 
 

 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121