श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर पाडूनच...! एएसआयने 'या' ऐतिहासिक दस्तावेजाच्या हवाल्याने केला खुलासा

    04-Feb-2024
Total Views | 378
 Mathura
 
लखनौ : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागी असलेले मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर मुघल शासक औरंगजेबाने तेथे शाही ईदगाहची इमारत बांधली होती. अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे दिली आहे. माहिती अधिकारांतर्गंत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, एएसआयने ही माहिती दिली.
 
उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील रहिवासी अजय प्रताप सिंह यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे देशभरातील मंदिरांची माहिती मागवली होती. यामध्ये मथुरा येथील श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. या उत्तरात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, आग्रा यांनी ऐतिहासिक नोंदींचा हवाला दिला आहे.
 
आरटीआयमध्ये दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, ब्रिटिश राजवटीत १९२० मध्ये अलाहाबाद येथून प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात यूपीच्या विविध जिल्ह्यांतील ३९ स्मारकांची यादी देण्यात आली आहे. यामध्ये ३७ व्या क्रमांकावर श्रीकृष्णाचे जन्मस्थान कटरा केशवदेव भूमीचा उल्लेख आहे. मशिदीच्या जागी पूर्वी कटरा टेकडीवर केशवदेव मंदिर होते, ते पाडून मशीद बांधण्यात आली, असे त्यात म्हटले आहे.
 
मथुरेचे केशवदेव मंदिर हे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे, जे सुमारे पाच हजार वर्षे जुने आहे. कंसाच्या कारागृहात ज्या ठिकाणी श्रीकृष्णाचा जन्म देवकीच्या पोटी झाला, त्या ठिकाणी नंतर केशवदेव मंदिर बांधण्यात आले, असे सांगितले जाते. श्रीकृष्णाचे पणतू व्रज आणि व्रजनाभ यांनी राजा परीक्षित यांच्या मदतीने हे मंदिर बांधले होते. ज्याचा इतर राजांनी वेळोवेळी जीर्णोद्धार केला.
 
मुघल आक्रमक औरंगजेबाने १६७० मध्ये मथुरेतील केशवदेवाचे मंदिर पाडण्याचा हुकूम जारी केला होता, असा हिंदू पक्षाचा दावा आहे. त्यानंतर तेथे शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली. या मशिदीत स्वतः औरंगजेब नमाज अदा करण्यासाठी आला होता, असे सांगितले जाते.
 
मथुरेतील हा वाद १३.३७ एकर जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित आहे. श्री कृष्ण जन्मस्थानभूमीकडे १०.९ एकर जमीन आहे, तर शाही इदगाह मशिदीकडे अडीच एकर जमीन आहे. हिंदू बाजू या संपूर्ण जमिनीवर आपला दावा करते. हिंदू बाजूनेही ईदगाहची रचना हटवून श्रीकृष्ण जन्मस्थानी मंदिर बांधण्याची मागणी केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121