"जरांगे पवार गटाकडून लोकसभा लढवणार!" भाजप नेत्याचा गौप्यस्फोट!

    27-Feb-2024
Total Views | 89
manoj jarange loksabha election

महाराष्ट्र : 
उपोषणकर्ते मनोज जरांगे हे पवार गटाकडून (मविआ) लोकसभा निवडणूक लढविणार, असा गौप्यस्फोट भाजप नेत्याने केला आहे. दरम्यान, जरांगेंना आधीपासूनच राजकीय महत्त्वांकाक्षा होती, त्यासाठीच त्यांनी मराठा आरक्षणाकरिता आंदोलन उभे केले असा दावादेखील भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, देशमुख यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाची मागणी उचलून धरणारे जरांगे आता नव्या पेचात सापडले आहेत. राज्य सरकारने त्यांच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. एकंदरीत, जरांगेंच्या उपोषणामागे मविआ नेत्यांचा हात आहे का, आणि तशा स्वरुपाचे गंभीर आरोपदेखील सत्ताधारी पक्षांकडून करण्यात येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष देशमुख यांनी केलेल्या दावामुळे राज्यात नवीन राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

भाजप नेते देशमुख म्हणाले, राजेश टोपे सातत्याने मनोज जरांगे यांना भेटून आंदोलनाची दिशा निश्चित करत होते, असा आरोप करतानाच जरांगे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून 'मविआ'चे उमेदवार म्हणून घोषित करण्याच्या तयारीत शरद पवार गट असल्याची माहिती आहे. तसेच, मविआच्या बैठकीत बीडची जागा मिळावी म्हणून शरद पवार गटाचे प्रयत्न असतील. देशमुख पुढे म्हणाले, सदर जागा शरद पवार गटाला मिळाल्यास तिथून मनोज जरांगे यांना उमेदवारी दिली जाईल, असेही देशमुख म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121