चिन्मय कृष्ण दास यांच्या पाठीशी इस्कॉन खंबीर

चारू चंद्र दास यांच्या "त्या" विधानानंतर निवेदन जारी

    30-Nov-2024
Total Views |

ISKCON supports Chinmaya Krishna Das

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (ISKCON supports Chinmaya Krishna Das) 
बांगलादेश सरकारद्वारा अटक करण्यात आलेले हिंदू संत चिन्मय कृष्ण दास यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे मत इस्कॉनने नुकत्याच जारी केलेल्या एका एक निवेदनातून स्पष्ट केले आहे. इस्कॉनने त्यामध्ये म्हटले आहे की, चिन्मय कृष्ण दास यांच्यापासून इस्कॉन कोणत्याही प्रकारे दूर झाले नसून, बांगलादेशातील अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या सर्व हिंदूंना संघटनेचा पाठिंबा आहे.

हे वाचलंत का? : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवावेत! : सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे

इस्कॉनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंदू आणि मंदिरांचे रक्षण करण्यासाठी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या चिन्मय कृष्ण दास यांच्या हक्क आणि स्वातंत्र्याचे समर्थन करण्यापासून इस्कॉनने स्वतःला कधीच दूर केले नाही व ते करणारही नाही. आम्ही इतर सर्व सनातनी संघटनांसह हिंदूंच्या सुरक्षेला आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांसोबत शांततापूर्ण वातावरण पुन्हा प्रस्थापित करण्यास समर्थन देतो."



वास्तविक बांगलादेश इस्कॉनचे सरचिटणीस चारू चंद्र दास यांनी एका पत्रकार परिषदेत इस्कॉन चिन्मय प्रभूंच्या वक्तव्याची किंवा कृतीची जबाबदारी घेणार नाही असे म्हटल्यामुळे देशभरातील हिंदू समुदायाकडून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. त्यानंतर इस्कॉनने निवेदन जारी करत, चारू चंद्र दास यांच्या विधानाचा विपर्यास झाला असून चिन्मय कृष्ण दास यांना त्यांच्या पदांवरून आणि इस्कॉनमधील सर्व संघटनात्मक क्रियाकलापांवरून काढून टाकण्यात आले आहे मात्र इस्कॉन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121