छत्रपती संभाजीनगर नावाचा सर्वात जास्त त्रास काँग्रेस आणि आघाडीला! पंतप्रधान मोदींचा घणाघात

    14-Nov-2024
Total Views | 141
 
Modi
 
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर नावाचा सर्वात जास्त त्रास काँग्रेस आणि आघाडीला झाल, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महायूतीची प्रचारसभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "एकीकडे संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त आहेत. तर दुसरीकडे, औरंगजेबाचे गुणगान गाणारे लोक आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी या शहराला छत्रपती संभाजीनगर नाव देण्याची मागणी केली, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पण अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता असतानाही काँग्रेसच्या दबावामुळे या लोकांची हिंमत झाली नाही. परंतू, महायूती सरकारने या शहराला छत्रपती संभाजीनगर नाव दिले. आम्ही बाळासाहेब ठाकरेंची ईच्छा पूर्ण केली."
 
हे वाचलंत का? -  महाविकास आघाडीची पंचसुत्री नव्हे, थापासुत्री! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका
 
"छत्रपती संभाजीनगर नाव दिल्याने सर्वात जास्त त्रास काँग्रेस आणि आघाडीला झाला. हा निर्णय बदलण्यासाठी लोक कोर्टापर्यंत गेलेत. ज्यांना संभाजी महाराजांच्या नावावर आक्षेप आहे आणि त्यांच्या मारेकऱ्यात आपला देव दिसतो ते लोक महाराष्ट्र आणि मराठी स्वाभिमानाच्या विरोधात उभे आहेत. अशा लोकांना महाराष्ट्र कधीच स्विकार करणार नाही. महाराष्ट्राला विकसित भारताच्या संकल्पाचे नेतृत्व करायचे आहे. भाजप आणि महायूती याच दिशेने काम करत आहे," असे ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा हा मोठा गौरव आहे. मात्र याचबरोबर पोर्तुगीजांच्या जुलमी जोखडातून वसई प्रांताला मुक्त करणाऱ्या नरवीर  चिमणाजी अप्पा यांच्या साहसी शौर्याची परिसीमा असलेल्या मुंब‌ईपासून अगदी हाकेच्या अंतरावरील वसईच्या ऐतिहासिक किल्लाचा देखील जागतिक वारसा यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमीनितीन म्हात्रे यांनी ..

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121