राज्यात मॉब लिचिंगप्रकरण झालेच नाही, आदित्य ठाकरे यांना साधू हत्याकांड प्रकरणाचा विसर
बापाच्या सत्तेसाठी लेकाने केला खोटा प्रचार
10-Nov-2024
Total Views | 115
मुंबई : महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या उबाठा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात मॉब लिचिंगचे (mob leaching case) प्रकरण घडले होते. आता हे प्रकरण खोटे असल्याची सारवासारव उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेना उबाठा आदित्य ठाकरे यांनी असे कधी महाराष्ट्रात पाहिले आहे का? असा फेक नेरॅटिव्ह तयार करणारा उलट प्रश्न पत्रकारांनी केला आहे.
सत्तेसाठी लाचार झालेली महाविकास आघा़डी आणि इतर घटक पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही फेक नॅरेटिव्ह तयार करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी २०२० साली मुख्यमंत्री पदी निवडून आले होते. आता त्यांच्याच सरकारच्या काळात पालघर जिल्ह्यातील दोन साधूंची हत्या करण्यात आली होती. काही पोलिसांनी त्या साधूंना दगडाने ठेसून मारण्यात आल्याची घटना घडली होती.
दरम्यान, आता हे सत्य नाकारून आदित्य ठाकरे यांनी मॉब लिचिंगप्रकरण महाराष्ट्रात घडले नाही, असे प्रतिपादन केले होते. आपल्या वडिलांच्या सरकारच्या काळात घडलेल्या घटनेवर सारवासारवर केली आहे. याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.