उबाठा गटाला दणका! राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

    15-Oct-2024
Total Views | 456
 
Thackeray
 
मुंबई : राज्यपाल नियुक्त सात आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यासाठी उबाठा गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर तातडीने सुनावणीही पार पडली. परंतू, न्यायालयाने या आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
 
राज्यपाल नियूक्त १२ आमदारांचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ७ आमदारांची नियूक्ती करणं योग्य नाही, असा आरोप उबाठा गटाने केला आहे. उबाठा गटाने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. परंतू, न्यायालयाने सात आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिला.
 
हे वाचलंत का? -  राज्यपाल नियुक्त सात आमदारांनी घेतली शपथ!
 
मंगळवारी दुपारी या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये भाजपचे विक्रांत पाटील, चित्रा वाघ आणि बाबूसिंग महाराज राठोड यांचा समावेळ आहे. तर शिवसेनेच्या मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांचा समावेश आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121