मला ईडीची कुठलीही नोटीस निघाली नाही : रोहित पवार

    06-Jan-2024
Total Views | 79

Rohit Pawar


मुंबई :
बारामती ॲग्रो गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या सहा ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली. याबद्दल आता रोहित पवारांनी पहिलीच प्रतिक्रीया दिली आहे. याप्रकरणी आपल्या नावाने कुठलीही नोटीस निघाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
रोहित पवार म्हणाले की, "पवार साहेबांच्या नावाने नोटीस निघाली होती. माझ्या नावाने कुठलीही नोटीस निघाली नाही. माझ्या अधिकाऱ्यांनी ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. मला जेव्हा नोटीस येईल तेव्हा मी तिथे जाऊन जे खरं आहे ते सांगेन. पण यावेळी मी विचार किंवा बाजू बदलेन असं काहीही होणार नाही. माझे विचार आणि लहानपणापासूनची शिकवण नक्कीच याबद्दलची दक्षता घेईल."
 
ते पुढे म्हणाले की, "आम्ही ईडीला सगळे कागदपत्रे दिलेली आहेत. मी खरंच चुक केली असती तर भारताबाहेर असताना मी परत आलो नसतो. तसेच चुक केली असती तर मी अजितदादांबरोबर जाऊन बसलो असतो. आमच्यासाठी विचार आणि महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे. आम्ही आमचा लढा तसाच सुरु ठेवू. ईडी असो किंवा कुठलाही विभाग असो त्यांना जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करत राहू," असेही ते म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121