'रामललांच्या दर्शनासाठी हनुमानजी स्वत: रोज यायचे'; मूर्तीकार अरुण योगीराज यांचा थक्क करणारा अनुभव!
25-Jan-2024
Total Views | 990
नवी दिल्ली : अयोध्येत विराजमान असलेली रामललाची मूर्ती देशातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. रामललाची मूर्ती तयार झाल्यानंतर पाहणारे ते पहिले व्यक्ती आहेत.अशा स्थितीत अभिषेक झाल्यानंतर अनेक माध्यमसमुहांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यांना त्यांचा अनुभव विचारण्यात आला. या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी आपल्या मुलाखतीत आश्चर्यचकीत करणारे अनुभव सांगितले.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना अरुण योगीराज म्हणाले की, हे काम मी स्वतः केले नाही, देवाने मला ते करायला लावले. जेव्हा ते रामललाची मूर्ती घडवत होते, तेव्हा ते त्या मूर्तीशी रोज बोलत असत. ते म्हणायचे, "प्रभु, मला सर्वांसमोर दर्शन द्या." योगीराजांच्या म्हणण्यानुसार जेव्हा मूर्तीचा अभिषेक करण्यात आला तेव्हा ही मूर्ती त्यांनी बनवली आहे का? असा त्यांनाच प्रश्न पडला. कारण त्या मूर्तीचे भाव बदलले होते. त्यामुळे प्रयत्न केला तरी अशी मूर्ती पुन्हा बनवता येणार नाही, अशी कबुली त्यांनी दिली.
Dumb question. Who wouldn't want his sculpture to be placed in the garbhagriha?
"In the end, Rama should look beautiful, splendid, dignified and look like a child at the same time and give Darshana to all."
ते म्हणाले, “मी जेव्हा मूर्ती बनवली तेव्हा ती वेगळी होती. गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर आणि अभिषेक झाल्यानंतर ती वेगळी झाली. मी गर्भगृहात १० दिवस घालवले. एके दिवशी मी बसलो होतो तेव्हा मला आतून वाटले की हे माझे काम नाही. मी त्यांना ओळखू शकलो नाही. आत जाताच त्याची आभा बदलली. मी आता ते पुन्हा तयार करू शकत नाही. लहान मूर्ती बनवण्याबाबत मी नंतर विचार करेन.”
रामललाच्या मूर्तीबद्दल बोलताना अरुण योगीराज अनवाणी बसलेले दिसले. ते म्हणाले की, जगाला राम दाखवण्याआधी स्वतःला राम मूर्तीत आहे, असे मानावे लागणार होते. त्यामुळे मला जगाला रामललांना दाखवण्याआधी स्वत: ला त्यांना बघायचे होते. मी त्यांना म्हणयचो, प्रभु मला दर्शन द्या. तर, देव स्वतः मला माहिती गोळा करण्यात मदत करत होता. दिवाळीत मला काही माहिती मिळाली.मला सापडलेली काही छायाचित्रे ४०० वर्षे जुनी आहेत. दरम्यान हनुमानजीही आमच्या दारात यायचे, दार ठोठावायचे, सगळं बघायचे आणि मग निघून जायचे, अशी भावना ही त्यांनी व्यक्त केली.
आपल्या विस्मयकारक अनुभवांची माहिती देताना ते म्हणाले, “मूर्ती बनवताना रोज संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत एक माकड त्या ठिकाणी येत असे, सर्व काही पाहून ते निघून जायचे. कडाक्याच्या थंडीत आम्ही दरवाजे बंद करू लागलो. हे पाहून तो पटकन दार उघडायचा, आत यायचा, बघायचा आणि निघून जायचा. कदाचित त्यालाही प्रभू रामांना बघायचे असेल. "
योगीराज यांना जेव्हा विचारण्यात आले की त्यांना काही स्वप्न पडले आहे का, तेव्हा त्यांनी सांगितले की, गेल्या ७ महिन्यांपासून त्यांना नीट झोप येत नाही. त्यामुळे ते यावर काहीही बोलू शकत नाहीत. आपण जे करतोय ते देशाला आवडले पाहिजे, असे त्यांच्या मनात सतत असायचे. आपला विश्वकर्मा समाज शतकानुशतके हेच कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या परिसरात एक म्हणही प्रचलित आहे - 'देवाच्या स्पर्शाने दगड फुलले आणि कलाकुसरीच्या स्पर्शाने दगड देव झाले.'
एवढे कौतुकास्पद काम करूनही अरुण स्वतः रामललाच्या मूर्तीचे सर्व श्रेय घेत नाहीत. ते म्हणतात की देवाने त्यांना हे करायला लावले. अन्यथा ते मूर्ती साकारू शकले नसते.त्यांनी दुसर्या एका मुलाखतीत सांगितले की, रामललाचे दगडातून मूर्तीत रूपांतर झालेले पाहण्यासाठी त्यांनी ६ महिने वाट पाहिली. त्यांनी बनवलेली राम मूर्ती ५१ इंच उंच असल्याचे त्यांनी सांगितले. कारण शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला होता की जर मूर्ती या आकाराची असेल तर रामनवमीच्या दिवशी सूर्याची किरणे थेट प्रभू रामाच्या डोक्यावर पडतील. या मुलाखतीत त्यांनी असेही सांगितले की त्यांचे सहाय्यक निघून गेल्यावर ते देवाच्या मूर्तीजवळ एकटेच बसायचे आणि देवाने इतरांसमोर दिसावे अशी प्रार्थना करायची.