श्रीराम मंदिराच्या स्मरणार्थ पोस्टाचे विशेष तिकीट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले अनावरण

    18-Jan-2024
Total Views | 55
 ram-modi
 
नवी दिल्ली : अयोध्येत दि. २२ जानेवारीला होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जगभरात जय्यत तयारी सुरु आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम जन्मभूमी मंदिरावरील स्मरणार्थ टपाल तिकिटे आणि जगभरातील प्रभू राम यांच्यावर जारी केलेल्या तिकिटांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. ४८ पानांच्या पुस्तकामध्ये अमेरिका, न्यूझीलंड, सिंगापूर, कॅनडा, कंबोडिया आणि सयुंक्त राष्ट्रसंघ सारख्या संस्थांसह 20 हून अधिक देशांनी जारी केलेली तिकिटे समाविष्ट आहेत.
 
टपाल तिकिटांसोबतच या पुस्तकात सहा शिक्क्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राम मंदिर, गणेश, हनुमान, जटायू, केवलराज आणि शबरी असे सहा शिक्के आहेत. त्यासोबत वेगवेगळ्या देशांच्या टपाल तिकिटांमध्ये राम मंदिर, चौपई 'मंगल भवन अमंगल हरी', सरयू नदी, सूर्य आणि मंदिराच्या आसपासची शिल्पे यांचा समावेश आहे.
 
पुस्तक प्रकाशनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आणखी एका कार्यक्रमात सामील होण्याची संधी आज मला मिळाली. आज श्री रामजन्मभूमी मंदिरावरील ६ स्मरणीय टपाल तिकिटे आणि प्रभू राम यांच्यावर जगभरातील तिकिटांचा अल्बम जारी करण्यात आला आहे. मी देशातील जनतेचे आणि जगभरातील सर्व रामभक्तांचे अभिनंदन करू इच्छितो."
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121