संघ वा संघ परिवारातील संस्थांमध्ये सर्व निर्णय सामूहिक चिंतनातून व चर्चेतून घेतले जातात. असे असले तरी या प्रक्रियेचे नेतृत्व कोणीतरी जबाबदार व्यक्तीने करावे लागते. अभाविपच्या राष्ट्रीय स्तरावरील या टीमचे नेतृत्व प्रथम प्रा. केळकर व पुढे मदनजींनी केले. प्रदीर्घ काळ चाललेल्या चिंतनातून व प्रत्यक्ष कार्यानुभवातून अभाविपचे संघटन मंत्र व संघटन तंत्र विकसित झाले. त्या प्रक्रियेला योग्य गती व दिशा देण्याचे कार्य या दोन्ही नेत्यांनी दीर्घकाळ अगदी समर्थपणे केले.
१९६०च्या दशकात अभाविप खर्या अर्थाने अखिल भारतीय संघटन म्हणून उभी राहायला सुरुवात झाली. महाराष्ट्रात या प्रक्रियेचे नेतृत्व प्रा. यशवंतराव केळकर यांच्याकडे होते. त्यांच्याबरोबर असलेल्या तरुण कार्यकर्त्यांच्या टीममध्ये सर्वश्री बाळ आपटे, अशोक मोडक, श्रीकांत धारप, सुरेश मोडक, मोहन आपटे, पद्मनाभ आचार्य यांच्यासारख्या अनेकांचा समावेश होता. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र संघटनात्मक कामासाठी पिंजून काढला. त्यासाठी आपापला व्यवसाय सांभाळून सतत प्रवास केला व संघटनेच्या, कार्यकर्त्यांच्या बांधणीला सुरुवात केली. विदर्भात दत्ताजी डिडोळकर यांनी ही जबाबदारी उचलली. उत्तरेत गिरीराज किशोर, राजकुमार भाटिया, तर दक्षिणेत कृष्ण भट्ट यांनी ही धुरा सांभाळली. १९६९ साली आपले उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लौकिक व ऐहिक जीवनाचा मोह टाळून मदनदास देवी या भारदस्त नावाचा युवक रा. स्व. संघात प्रचारक म्हणून दाखल झाला. पुढे लवकरच संघाच्या योजनेतून त्यांच्याकडे अभाविपच्या विस्ताराची व विकासाची पूर्णकालीन जबाबदारी सोपविण्यात आली. विविध स्तरांवर संघटनेचे काम करीत ते पहिले अ. भा. संघटनमंत्री झाले. त्या नात्याने ते केळकर टीमचे सक्रिय सदस्य बनले. १९९२ पर्यंत अखंडभ्रमंती करीत आपले दायित्व त्यांनी समर्थपणे सांभाळले. १९९२ नंतर ते पुन्हा मातृसंस्थेत परतले. प्रकृती स्वास्थ्य असेपर्यंत ते संघाच्या सह सरकार्यवाह पदावर कार्यरत होते.
संघ वा संघ परिवारातील संस्थांमध्ये सर्व निर्णय सामूहिक चिंतनातून व चर्चेतून घेतले जातात, असे असले तरी या प्रक्रियेचे नेतृत्व कोणीतरी जबाबदार व्यक्तीने करावे लागते. अभाविपच्या राष्ट्रीय स्तरावरील या टीमचे नेतृत्व प्रथम प्रा. केळकर व पुढे मदनजींनी केले. प्रदीर्घ काळ चाललेल्या चिंतनातून व प्रत्यक्ष कार्यानुभवातून अभाविपचे संघटन मंत्र व संघटन तंत्र विकसित झाले. त्या प्रक्रियेला योग्य गती व दिशा देण्याचे कार्य या दोन्ही नेत्यांनी दीर्घकाळ अगदी समर्थपणे केले.
ज्ञान, चारित्र्य व एकता या त्रिसूत्रीवर अभाविपची उभारणी झाली. ज्ञान म्हणजे शिक्षण क्षेत्र, चारित्र्य म्हणजे व्यक्तिनिर्माण व व्यक्तिविकास, एकता म्हणजे राष्टर्र्ेक्य भावनेतून होणारे जनसंघटन. कोणत्याही संघटनेचा विकास होण्यासाठी तिला नित्य विकसित होणारी सैद्धांतिक भूमिका, ती अभिव्यक्त होण्यासाठी लागणारी कार्यपद्धती व कार्यकर्ता विकासाची प्रकिया विकसित व्हावी लागते. ही सैद्धांतिक भूमिका परिषदेने राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक संदर्भात विकसित केलेली दिसते. तिच्या कार्यपद्धती विकासात शहर/नगर, जिल्हा, प्रांत क्षेत्रे व अ. भा. स्तरावरील कार्यकारिण्यांची रचना व त्यांची कार्य चौकट यांचा समावेश होतो. विविध पातळ्यांवरील क्रियाशील बैठका, अभ्यासवर्ग, शिबिरे, प्रांत वा अखिल भारतीय स्तरावरील अधिवेशने, टीम बैठका, चिंतन बैठका यातून कार्याची उभारणी व कार्यकर्त्यांचा विकास होत असतो. या सर्व प्रकियेत मदनजींचे योगदान महत्त्वाचे व मोठे होते.
विद्यार्थी परिषदेच्या कामात विद्यार्थी कार्यकर्त्याचा सहभाग सात-आठ वर्षांपेक्षा जास्त नसतो. त्या मर्यादित काळात त्याचे व्यक्तिमत्त्व व कार्यकर्तेपण यांच्या विकासाची जबाबदारी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीतून परिषद पार पाडते. या कार्यकर्त्याच्या जडणघडणीत कार्यकर्त्यास शक्यतो कोणताही 'Factory defect' राहू नये व तो 'Finished product' या स्वरूपात बाहेर पडावा, अशी परिषदेची भूमिका असते. त्यासाठी प्रत्यक्ष जबाबदारी घेऊन काम करीत असताना तो कार्यकर्ता 'Chiseling out the unessential'या प्रक्रियेतून जात असतो. प्रत्येक कार्यकर्ता हा अपूर्ण असतो आणि त्याचा प्रवास पूर्णत्वाकडे होणे हे विद्यार्थी परिषदेत अपेक्षित असते. या कार्यकर्त्यांनी पुढे राष्ट्रभारतीच्या कार्यात व आपल्या आवडीच्या क्षेत्रात समरसून काम करावे, अशी अपेक्षा असते. संपर्क, संवाद व सहवास या माध्यमातून परिषदेचे ज्येष्ठ व प्राध्यापक कार्यकर्ते या प्रक्रियेत सहभागी होत असतात. या प्रक्रियेतून विकसित झालेले अनेक कार्यकर्ते आज राष्ट्रजीवनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.
मदनजींनी कार्यपद्धती व व्यक्तिविकास यांची रचना करताना जो स्वप्न पाहिले, ते आज साकार होताना दिसत आहे. आता तीन आठवणी. व्यक्तिगत व मदनजींशी जोडलेल्या... १) १९६६ साली संघशिक्षा वर्ग संपल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठात घ्यावे असे ठरले. ‘माझी निवास व्यवस्था होईपर्यंत तू मोती बागेत राहा’ असा सल्ला मला मा. दामुअण्णा दाते यांनी दिला. तेथे मदनजी निवासाला असलेल्या खोलीतच माझीही व्यवस्था करण्यात आली. जवळजवळ महिनाभर मला त्यानिमित्ताने मदनजींचा सहवास लाभला. याच काळात एरवी मिळत असलेल्या मदनजींचे संवाद कौशल्य, विचारांची स्पष्टता, विषयाच्या मुळाशी जाण्याचीमानसिकता, गोळीबंद व तर्कशुद्ध मांडणी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये मी अनेक चर्चांतून अनुभवली. त्या अविस्मरणीय कालखंडात आमच्यात जी आत्मियता, जवळीक निर्माण झाली ती कायम राहिली.
१९७०च्या शतकात नाशिक येथे ज्येष्ठ कार्यकर्त्यांची एक तीन दिवसीय चिंतन बैठक झाली होती. मदनजी त्या बैठकीत पूर्णवेळ उपस्थित होते. या बैठकीतील बीजभाषणांत त्यांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील गुंतागुंतीच्या सामाजिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. सामाजिक अभिसरणाशिवाय या परिस्थितीत गुणात्मक फरक पडणार नाही, असा मुद्दा त्यांनी विविध उदाहरणासंह मांडला. अभाविपचे काम समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावे, ते सर्वसमावेशक व्हावे, असा त्यांच्या मांडणीचा मथितार्थ होता. याच बैठकीत त्यांनी ‘सर्वस्पर्शी काम’ या संकल्पनेची मांडणी केली. पुढे तो आयाम परिषदेच्या कामाशी सर्वार्थाने जोडला गेला, हा इतिहास आहे. यावर झालेल्या सखोल चर्चेत व विमर्शात मदनजींची भूमिका 'Understanding Mind' समजूतदार मन व 'Leading from the front' अशी होती. पुढे संघाचेही सामाजिक समरसता मंचाचे काम उभे राहिले. ते एका अर्थाने ‘सर्वस्पर्शी कामा’चेच व्यापक रुप आहे. आज तर ‘समरसता’ हा संघाच्या गतिविधीचाच एक भाग बनला आहे.
३) अलीकडेच म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये मदनजींचा डोंबिवली येथे सतीश मराठे यांच्या निवासस्थानी दोन दिवस मुक्काम होता. त्यानिमित्ताने येथील पूर्व कार्यकर्त्यांच्या मदनजींबरोबर गप्पागोष्टी असा कार्यक्रम झाला. प्रकृती ठीक नसतानाही मदनजींनी प्रत्येक कार्यकर्त्याची अगदी आस्थेने विचारपूस केली व त्यांचे अनुभव शांतपणे ऐकून घेतले.राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपापल्या रुचीनुसार कार्यरत राहा, ती काळाची गरज आहे, अशा मोजक्या शब्दांत त्यांनी बैठकीचा समारोप केला. मी त्यांना माझी दोन पुस्तके भेट दिली. त्यावर ‘पुढील लेखन प्रकल्प कोणता?’ असा शोधक प्रश्न त्यांनी विचारला. ती बैठक संस्मरणीय ठरली. तेच मदनजींचे अखेरचे दर्शन.
संघटनशास्त्राचे भाष्यकार असलेल्या मदनजींची विचार व्यवहार व कार्यकर्ता संपर्क ही जीवनाची त्रिसूत्री होती. या व्रती कार्यकर्त्यांच्या पुण्यपावन स्मृतींना विनम्र अभिवादन!
प्रा. श्याम अत्रे
९३२४३६५९१०