बिहार : बिहारचे खान सर हे कायम त्यांच्या शिकवण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध असतात. आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खान सरांनी रक्षाबंधनाला एक-दोन नव्हे तर तब्बल ७००० राख्या बांधल्या आहेत. खान सरांनी आपल्या कोचिंग सेंटरमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात जवळपास ७००० विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. या सर्वच मुलींनी खान सरांच्या हाताला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
एवढ्या राख्या बांधून खान सरांच्या हातावर जणू राख्यांचा डोंगरच तयार झाला आहे. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात त्यांनी "आपल्या बहिणींना शिकू द्या, त्यांना बांधून ठेवू नका," असे आवाहन संपूर्ण देशवासियांना केले आहे. तसेच सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
खान सर दरवर्षी आपल्या कोचिंग सेंटरमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये दूरदूरुन मुले शिकायला येतात. त्यांना आपल्या कुटुंबाची उणीव भासू नये हा या कार्यक्रमामागीन उद्देश असतो.