सावित्रीबाई फुले वसतिगृह प्रकरण; हलगर्जीपणा करणा-या वार्डनवर कारवाई करा : राज्यमंत्री रामदास आठवले

    09-Jun-2023
Total Views | 29
Union Minister of State for Social Justice Ramdas Athawale

मुंबई
: मुंबईतील चर्नीरोड येथील सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील दलित मुलीच्या झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी संबंधित वसतिगृहाच्या अधिक्षिका वार्डन वर्षा अंधारे यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केली आहे. तसेच, राज्यभरातील सर्व मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षेचे ऑडीट करून शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपयांची सांत्वनपर मदत बळीत मुलीच्या कुटुंबाला करण्यात यावी, असेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी म्हणाले.

दरम्यान, राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चर्नीरोडच्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहाला भेट देऊन झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस आणि माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, एड. आशा लांडगे, एड. अभया सोनवणे, उषा रामलु ;संघारती;सचिन बनसोडे; भीमराव सवातकर; सोना कांबळे; शिरीष चिखलकर तसेच एसीपी राजेशसिंह चंदेल आणि पोलीस तपास अधिकारी बांगर, वस्तीगृहाच्या अधिक्षिका वर्षा अंधारे आणि सोनाली मोरेही उपस्थित होते.

दरम्यान, बळी गेलेली मुलगी ही खेरवाडी बांद्रा येथे शिक्षण घेत होती. २०२२ पासुन तिने या वसतिगृहात प्रवेश केला होता. ती मुळची अकोला विदर्भातील होती. या दलित मुलीवर येथील वॉचमन व धोबीचे काम करणा-या व्यक्तीने तिचा विनयभंग करुन तिचा गळा आवळुन तिची हत्या केली. आणि त्यानंतर त्याने स्वतःही रेल्वे स्थानकात जावुन रेल्वेखाली आत्महत्या केली. हया प्रकरणाची मुंबई पोलीसांनी सखोल चौकशी केली पाहिजे. अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

या महिलांच्या वसतिगृहात पुरुष कर्मचारी काम करत होता. सुरक्षा रक्षक पुरुष होता या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये संबंधीत आरोपी हा पाईपला धरुन वरच्या माळयावर चढत होता अशी माहिती मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच हत्या झालेली मुलगी वसतिगृहाच्या चौथ्या माळयावर एकटीच थांबली होती. ही बाब वार्डन वर्षा अंधारे यांना माहित होती. त्यांनी आपल्या अधिकारात इतर मुलीसोबत तिला ठेवायला पाहिजे होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा केला असल्यामुळे या वसतिगृहाच्या अधिक्षका वार्डन अंधारे यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

या प्रकरणी रामदास आठवले यांनी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करुन संबंधित वसतिगृह शिक्षण खात्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे याबाबत सर्व महिला वसतिगृहाचे सुरक्षा ऑडीट करावे, महिला सुरक्षासाठी या वसतिगृहांत शासनाचे सुरक्षा रक्षक नेमले पाहिजेत. खाजगी सुरक्षा रक्षक नेमु नयेत. याबाबतही सुचना केलेल्या आहेत. आणि प्रकरणात एकुणच आपल्या कर्तव्यात कसुर करणा-या संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
तसेच बळीत मुलीच्या आईवडिलांची ना. रामदास आठवले यांची आज बांद्रा येथे भेट घेवून त्यांचे सांत्वन केले असून दलित मुलीची झालेली हत्या निषेधार्ह आहे;असे प्रकार पुन्हा घडता कामा नये याची खबरदारी शासनाने घ्यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121