छ. संभाजीनगरात 'केरला स्टोरी पॅटर्न'! 'लव्ह जिहाद'चा कट उघडकीस!

    30-May-2023
Total Views | 5578
 
Love Jihad
 
 
संभाजीनगर : पतीसोबत वाद झाल्याने रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या २५ वर्षीय विवाहितेने मैत्रिणीचं मुस्कान शेखचं घर गाठलं. आश्रय घेण्यासाठी आलेल्या विवाहितेला मुस्कान ने आपल्या आई सोबत हातमिळवणी करत शाहरुख नावाच्या व्यक्तीसोबत पिडीतेचं लग्न लावण्याचं षडयंत्र रचलं. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीतेचा पतीशी वाद झाला यामुळे रागाच्या भरात ती घर सोडून गेली. तिने जोगेश्वरी येथे राहणाऱ्या मुस्कान शेख नावाच्या मैत्रिणीचे घर गाठलं. या ठिकाणी तिने मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मैत्रीण मुस्कान सोनालीला म्हणाली तुझा नवरा आता तुला घरात घेणार नाही, आपण घरीच राहिलो तर बोर होऊ असे म्हणत, चितेगाव येथे राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी सोनालीला रिक्षाने घेऊन गेली.
 
चितेगाव येथे गेल्यानंतर मुस्कान पिडीतेला एका खोलीत घेऊन गेली. दरम्यान, काही वेळाने मुस्कानची आई मुन्नी शेख व तिचा मित्र शाहरुख सय्यद खोलीवर आले. सोनालीला घरातील संपूर्ण वातावरण बघून काहीतरी विचित्र होत असल्याचे लक्षात आलं. यावेळी तिने मला या ठिकाणी राहायचं नाही मला घरी नेऊन सोडा अशी मागणी तिघांकडे केली.यावर या तिघांनी तुला आता इथेच राहायचं आहे आम्ही तुला पतीकडे सोडणार नाही. आम्ही तुझं लग्न शाम नरवडे नावाच्या व्यक्तीसोबत लावून देणार आहे. तो तुला सुखात नांदवेल असे सांगत मुस्कान, मुन्नी आणि शाहरुख या तिघांनी मिळून सोनालीला दोन दिवस खोलीत डांबून ठेवलं.

 
त्यानंतर हे तिघेजण पिडीतेला बीड बायपास परिसरात असलेल्या एका दोन मजली इमारती घेऊन गेले. त्या ठिकाणी असलेल्या वयस्कर व्यक्तीसोबत तुला लग्न करावे लागेल याशिवाय तुला पर्याय नाही असं धमकावले. ती लग्न करण्यास तयार नसल्यामुळे त्या वयस्कर व्यक्तीने ही मुलगी लग्नासाठी तयार नसेल तर दुसरी मुलगी लग्नासाठी घेऊन या असे या तिघांना सांगितलं. दरम्यान, तरुणी  लग्नाला तयार होत नसल्यामुळे मुस्कान मुन्नी आणि शाहरुख या तिघांनी तिला चितेगाव येथे घेऊन जात मारहाण केली. त्यानंतर तिघेही घरातून बाहेर पडले यावेळी संधी साधत पिडीतेने शेजारी असलेल्या महिलेकडून आपल्या घरी जाण्यासाठी ३० रुपये घेतले.
 
ती आपल्या तावडीतून निसटल्याचे तिघांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा पाठलाग सुरू केला. तिला रस्त्यात आडवत मारहाण करत रिक्षात बसून घाणेगावला घेऊन आले. दरम्यान, काही वेळाने पिडीतेने त्या तिघांचे लक्ष चुकवत एका व्यक्तीच्या फोनवरून पतीला संपर्क करून घटनाक्रम सांगितला. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
 

 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

दिवा-मुंब्रा घटनेबद्दल माहितीसाठी मध्य रेल्वेचे जनतेला आवाहन केले आहे. सोमवार, दि.९.०६.२०२५ रोजी सकाळी ९.०१ वाजताच्या सुमारास झालेल्या एका दुर्दैवी घटनेत, दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करणारे सुमारे ८ जण त्यांचा तोल गेला आणि चालत्या ट्रेनमधून पडले. रेल्वे प्रशासनाने या घटनेचे कारण तपासण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. याचसोबत प्रवासी जनता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना या घटनेबद्दल आणि त्याच्याशी संबंधित बाबींबद्दल कोणतीही ..

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

आगामी वाहतूककोंडी मुंबई महानगर प्रदेशात विविध प्रकल्पांना गती असतानाच आता बहुप्रतीक्षित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला आता राज्य सरकारकडून गती देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २२ हजार २५० कोटी रुपये कर्जास मंजुरी दिली आहे.भूसंपादनासाठी आवश्यक कर्जासाठी राज्य सरकारने शासन हमी घेतली आहे, त्यामुळेविरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे...

मुंबई मेट्रो ९ने गाठला महत्वाचा टप्पा एमएमआरडीएने दिली माहिती

मुंबई मेट्रो ९ने गाठला महत्वाचा टप्पा एमएमआरडीएने दिली माहिती

एमएमआरडीएच्या ३३७.१० किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान जोडणारा असून, सध्या या मार्गाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. या अंतर्गत, भायंदर पश्चिम येथील उड्डाण पुलाजवळील अत्यंत आव्हानात्मक आणि वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टील गर्डर यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आला. हे कार्य मर्यादित रात्रीच्या वेळेत विविध यंत्रणांमधील अचूक समन्वयाने पूर्ण करण्यात आले, असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली ..

शाहिदी शताब्दी आणि गुरु-ता-गद्दी समागमच्या आयोजनासाठी सहकार्य करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

शाहिदी शताब्दी आणि गुरु-ता-गद्दी समागमच्या आयोजनासाठी सहकार्य करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा ३५० वा शाहिदी आणि गुरुगोविंद सिंगजी यांचे ३५० वा गुरु-ता-गद्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यात नांदेड, नागपूर व मुंबई या तीन ठिकाणी करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या कार्यक्रमांमधून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी व गुरुगोविंद सिंगजी यांचा इतिहास निश्चितच पुढील पिढीपर्यंत पोहोचविता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121