नाशिकमधील गतीरोधकांचे होणार फेरसर्वेक्षण

परवानगी न घेता उभारलेले गतिरोधकही हटविणार

    21-Apr-2023
Total Views | 59
nashik

नाशिक
: शहरातील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी अनेक रस्त्यांवर स्पीड ब्रेकर उभारण्यात आले. काही ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी चुकीच्या पद्धतीने स्पीड ब्रेकर केले गेले. यामुळे अपघात कमी होण्यास मदत होत असली तरी अशास्त्रोक्त गतीरोधकांमुळेच अपघातही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ते पाहता महापालिका शहरात स्पीड ब्रेकरची गरज आहे किंवा नाही याबाबत फेरसर्वेक्षण करणार आहे.

शहरात सध्या चारशेच्या आसपास स्पीड ब्रेकर आहेत. रस्ता सुरक्षा समितीकडून शहरात स्पीड ब्रेकर उभारणीस मंजुरी दिली जाते. त्यात लोकप्रतिनिधी, महापालिका बांधकाम विभाग, आरटीओ, तंत्रनिकेतन, वाहतूक पोलीस व काही एनजीओंचा सहभाग असतो. या समितीकडे अपघात रोखण्यासाठी शहरातील अनेक रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसविण्याची नागरिकांकडून मागणी केली जाते. पण स्पीड ब्रेकरची संख्या नियंत्रित असावी, अशीदेखील मागणी पुढे येत आहे. त्यामुळे मनपा बांधकाम विभाग रस्ता सुरक्षा समितीमार्फत कोठे स्पीड ब्रेकर असावेत, कोणत्या रस्त्यावर स्पीड ब्रेकरची गरज नाही याचे सर्वेक्षण करून सखोल अहवाल तयार केला जाईल.

रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी सिग्नल निर्माण करणे व विविध चौकांत, सिग्नल, रस्ता क्रॉसिंग, गतिरोधक असेल तेथे सफेद पट्टे मारणे, कॅट आय लावणे, फलक लावणे आदी उपाययोजना कराव्यात, ही मागणी केली जात आहे. लवकरच रस्ता सुरक्षा समितीची बैठक होणार असून, त्यात वरील मुद्यांवर काम केले जाणार आहे.

टेबल स्पीड ब्रेकर साकारणार

शहरातील बहुतांश रस्त्यांवर रॅम्बलर पद्धतीचे स्पीड ब्रेकर आहेत. त्यावरून मार्गक्रमण करताना अपघातांचे प्रमाण वाढत आहे. नव्या सर्वेक्षणात अशा पद्धतीचे स्पीड ब्रेकरऐवजी स्पीड टेबल स्पीड ब्रेकरवर भर दिला जाणार आहे. या नव्या स्पीड टेबल स्पीड ब्रेकरवर दिव्यांग व्यक्ती देखील व्हीलचेअरवरून मार्गक्रमण करू शकतील.

मुंबई नाका येथे भुयारी मार्गाचा पर्याय

मुंबई नाका सर्कल येथे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भुयारी मार्ग केला जाणार आहे. द्वारका सर्कलवर नॅशनल हायवेकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत. तर मिर्ची चौकातील अपघात स्थळे नाहीशी केली जाणार आहे. 



अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121