राहुल गांधींचे गुरु सॅम पित्रोदांचे राम मंंदिरावर बेताल विधान; म्हणाले,"राम मंदिर महत्वाचे की..."

    28-Dec-2023
Total Views | 205
 
Sam Pitroda
 
 
नवी दिल्ली : देश अयोध्येतील राम मंदिराच्या तयारीत व्यस्त असताना काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, राम मंदिर हाच खरा मुद्दा आहे का? शिक्षण, रोजगार, अर्थव्यवस्था, महागाई, आरोग्य हे प्रश्न राम मंदिरापेक्षा मोठे आहेत. या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. असं मोठं वक्तव्य सॅम पित्रोदा यांनी केलं आहे.
 
एएनआयसोबत बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले, "मला कोणत्याही धर्माबद्दल काही अडचण नाही. मंदिरात एकदा तरी जायला हरकत नाही, पण तुम्ही ते मुख्य व्यासपीठ बनवू शकत नाही. देशात आज अनेक मोठे प्रश्न आहेत. मात्र, त्या प्रश्नांना बगल दिली जात आहे. मोदी हे केवळ हिंदूंचे नाही तर सर्व धर्मियांचे पंतप्रधान आहेत. आणि हाच संदेश भारतातील जनतेला हवा आहे. राम मदिरापेक्षा रोजगाराबद्दल बोला, महागाईबद्दल बोला, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि देशपुढील असलेल्या आव्हानांबद्दल बोला. आज देशांपुढील महत्वाचे प्रश्न हे बाजूला ठेवले जात आहे. राममंदिर हा खरचं देशाचा मुद्दा आहे का? की बेरोजगारी हा खरा मुद्दा आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121