बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्ष? शरद पवारांनी दिलं उत्तर...

    02-Dec-2023
Total Views |

shard ajit
 
पुणे: अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल शुक्रवारी कर्जत येथिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन सभेत अनेक गौप्यस्फोट केले होते त्याला शरद पवार यांनी प्रतिउत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
अजित पवार जे काही बोलले त्यातील अनेक गोष्टी मी पहिल्यांदाच ऐकत आहे असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी २००४ लाच भाजप सोबत जाण्याचा विचार झाला होता असा दावा केला होता त्यावर उत्तर देताना "आमचे अनेक लोक वेगवेगळ्या विचारांचे आहेत, आशा प्रकारच्या मागणीवर चर्चा झाली होती. पण ज्या पक्षाबरोबर जाण्याचा विचार होत होता तो विचार आम्हाला मान्य नव्हता" असं म्हटलं आहे.
 
"आमचे विचार भाजपशी सुसंगत नाहीत. आम्ही भाजपमध्ये जाण्यासाठी लोकांकडे मते मागितली नव्हती. त्यामुळे ज्या लोकांनी आपल्याला मतं दिली आहेत त्यांची फसवणूक करणं योग्य नाही. असही ते यावेळी म्हणाले".यावर शरद पवारांना मग शिवसेनेसोबत निवडणूक का लढवली असा प्रश्न विचारण्यात आला तेंव्हा "आमची शिवसेनेबद्दल वेगळी भूमिका होती व आमची भूमिका भाजपविरोधी आहे असे उत्तर दिले".
 
 
राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या बारामती सह चार मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याच कर्जतच्या सभेत अजित पवार यांनी सांगितलं होतं. त्यावर उत्तर देताना. "भारतात लोकशाही आहे त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष आपली भूमिका घेऊन बारामती लोकसभा असेल किंवा आणखी कोणती लोकसभा असेल तेथे लोकांसमोर जाऊ शकतो त्यामुळे अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढवली तरी तक्रार करण्याचं करण नाही" असं म्हटलं आहे.
 
तत्पूर्वी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला आजच्या बैठकीतील चर्चेच्या विषयांबद्दल बोलताना राज्यातील दुष्काळी स्थिती आणि काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. तरी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांनसाठी वेळ द्यावा यासाठी ही बैठक झाल्याचे सांगितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा हा देश पातळीवरून नेला. स्वदेशी,स्वधर्म जागरूत करून राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. या सर्व कामासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले.आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे.‘असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले. नुकतेच मातंग साहित्य परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्र विभाग व अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या वतीने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी ..

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

"राज्य सरकार मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात असुन प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे. याॲपला जय महाराष्ट्र, महा-राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य सरकारच्या अंतिम मान्यतेने हे शासकीय ॲप लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121