हिमंता सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील १२८१ मदरसे केले बंद!

    14-Dec-2023
Total Views | 120
Assam govt converts 1,281 madrasas into regular schools

दिसपुर : आसामच्या हिमंता बिस्वा सरकारने राज्यातील सरकारी मदतीने चालवलेले १२८१ मदरसे बंद केले आहेत आणि त्यांच्या जागी इंग्रजी शाळा सुरू केल्या आहेत. त्याबाबतचे आदेशही शासनाने जारी केले आहेत. आता या मदरशांमध्ये इस्लामिक शिक्षणाऐवजी सामान्य विषय शिकवले जाणार आहेत.
 
१२८१ मदरसे बंद करण्याच्या आसाम सरकारच्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना, राज्याचे शिक्षण मंत्री रनोज पेगू यांनी ट्विटरवर लिहिले की, सर्व सरकारी आणि प्रादेशिक शाळांना SEBA अतंर्गत १२८१ मदरशांना माध्यमिक शिक्षण शाळांमध्ये रूपांतरित करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

आसाम सरकारने जारी केलेल्या यादीनुसार, आसाम-बांगलादेश सीमेवर असलेल्या धुबरी जिल्ह्यात बहुतांश मदरसे बंद करण्यात आले आहेत. त्यांची संख्या २६८ आहे. याशिवाय बारपेटा, नोगाव आणि गोलपारा आदी भागातही मोठ्या प्रमाणात मदरसे बंद करण्यात आले आहेत. बांगलादेशातून येणाऱ्या अवैध घुसखोरांनीही हे जिल्हे भरलेले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आधीच सांगितले आहे की त्यांना राज्यातील सर्व मदरसे बंद करायचे आहेत कारण नवीन भारतात लोकांना मदरसे नव्हे तर डॉक्टर, अभियंते आणि व्यावसायिक तयार करणाऱ्या शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांची गरज आहे.
 
 
यापूर्वी आसाममध्ये ६०० मदरसे बंद करण्यात आले होते. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कर्नाटक निवडणुकीदरम्यान आयोजित सभेत सांगितले होते की त्यांनी राज्यातील ६००मदरसे बंद केले आहेत आणि सर्व मदरसे बंद करण्याची इच्छा आहे.

या वर्षी मे महिन्यातही आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ३०० मदरसे बंद करणार असल्याचे सांगितले होते. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी याला पोलीस आणि जातीयवादी संघटनांमधील चर्चेचे फलित म्हटले होते. आसाम सरकार राज्यातील बेकायदेशीर घुसखोर आणि कट्टरतावाद यांच्याबाबत अत्यंत कडक वृत्ती अवलंबत आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121