जुन्या पेन्शनवर अजितदादांनी केली महत्वाची घोषणा!

    14-Dec-2023
Total Views | 102

Ajit Pawar


नागपूर :
जुन्या पेन्शनबद्दल येणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी कर्मचाऱ्यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. बुधवारी जुन्या पेन्शनबद्दल राज्य सरकारची कर्मचाऱ्यांबरोबर बैठक पार पडली. त्यानंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "काल आमची कर्मचारी संघटनांसोबत बैठक पार पडली असून विधानसभा निवडणुकीपुर्वी महायुती सरकार जुन्या पेन्शनचा सकारात्मक विचार करेल. तसेच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या मागणीबद्दल योग्य निर्णय घेतला जाणार आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
 
ते पुढे म्हणाले की, "२०३१-३२ पासून जुनी पेन्शनबद्दलची अंमलबजावणी सुरु होणार आहे असे कर्मचाऱ्यांना सांगिल्यानंतरही आम्हाला मार्ग काढून द्या अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचे चार ते पाच प्रश्नांवर सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच येणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंत याबद्दलता निर्णय घेण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले," अशी माहिती त्यांनी दिली.
 
जास्त ताणून न धरता संपाच्या बाबतीत टोकाचा निर्णय घेऊ नये असे आवाहन कर्माचाऱ्यांना केले असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय कांदा, इथेनॉल प्रश्न यासारख्या तीन-चार प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अमित शहांची वेळ घेतली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.



अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121