रवींद्र वायकर ईडीच्या कचाट्यात, ठाकरेंच्या अडचणीत वाढ!

    03-Nov-2023
Total Views | 96
ED registers money laundering case against Ravindra Waikar

मुंबई : कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून ऑक्टोबरमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ईडीने रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ईडीने मनी लॉड्रिंग प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्यावरही गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच मुंबई पोलीसांनी वायरकांसह ६ जणांवर ही गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणात गुन्ह्याच्या दृष्टीने तपास करत आहेत.
 
रवींद्र वायकर यांच्यावर कोणते आरोप?

जुलै २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथे लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर २ लाख स्केवअर फुटाचे ५०० कोटी रुपयांचे ५ स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी रवींद्र वायकर यांना दिली होती. दरम्यान मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बॅक्वेटच्या नावाने हा शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप वायकर यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. तरी लवकरच रवींद्र वायकर यांना ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे 'हिसाब तो देना पडेगा' असे म्हणत सोमय्यांनी वायकरांना टोला लगावला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सर्वाधिक उंच पूल ; १२ मजली इमारतीच्या उंचीचा पूल प्रगतीपथावर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सर्वाधिक उंच पूल ; १२ मजली इमारतीच्या उंचीचा पूल प्रगतीपथावर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच म्हणजेच १२ मजली इमारतीइतक्या उंचीचा पूल सध्या अहमदाबादमधील साबरमती नदीवर बांधला जात आहे. एकूण ४८० मीटर लांबीचा हा पूल पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गालगत बांधला जात आहे. ज्याची उंची सुमारे १४.८ मीटर आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर, तो केवळ आधुनिक संपर्काचे प्रतीक ठरणार नाही तर हाय-स्पीड पायाभूत सुविधांमध्ये व अस्तित्वातील रेल्वे नेटवर्कमध्ये सुसंवाद कसा साधता येतो याचे उत्कृष्ट उदाहरणही ठरेल...

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121