मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानच्या 'लष्कर-ए-तैयबा'बद्दल इस्त्रायलचा मोठा निर्णय!

    21-Nov-2023
Total Views | 42

26/11 attack


मुंबई : मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानच्या 'लष्कर-ए-तैयबा' संघटनेला इस्त्रायलने दहशतवादी संघटना घोषित केले आहे. यावर्षी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला १५ वर्षे पुर्ण होणार आहेत. अशावेळी इस्त्रायलने हे पाऊल उचलले आहे.
 
इस्रायली दूतावासाने मंगळवारी यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. इस्रायलने हे पाऊल भारत सरकारच्या कोणत्याही विनंतीवरून नव्हे तर स्वतःहून उचलले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. तसेच जागतिक स्तरावर दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेतल्याचेही दुतावासाने सांगितले आहे.
 
यासोबतच लष्कर-ए-तैयबा ही एक भयानक आणि निषेधार्ह दहशतवादी संघटना असून शेकडो भारतीयांच्या आणि अन्य लोकांच्या हत्येला जबाबदार आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भयानक हल्ल्याची आठवण आजही अनेकांच्या मनात जागी असल्याचेही दुतावासाने म्हटले आहे. दरम्यान, मुंबईतील या दहशतवादी हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.



अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121