सिक्कीमध्ये हाय अलर्ट! आणखी एक तलाव फुटण्याच्या मार्गावर

    07-Oct-2023
Total Views | 72

Sikkim flood


गंगटोक :
सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले. या घटनेतून अद्याप सावरले नसतानाच आता पुन्हा एकदा अलर्ट देण्यात आला आहे. सिक्कीममधील आणखी एक तलाव फुटण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
यावेळी शाको चू तलावाची स्थिती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. राजधानी गंगटोकपासून १३५ किमी अंतरावर असलेल्या लाचेन व्हॅलीतील शाको चू तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे. असे झाल्यास सिक्कीममध्ये पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
दरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी सिक्कीममध्ये ढगफुटी होऊन तिस्ता नदीला पूर आल्याने तेथील लष्कराचा कॅम्प वाहून गेला. या पुरात लष्करातील २३ जवान बेपत्ता झाले होते. यापैकी ७ जवानांने मृतदेह सापडले आहेत. तसेच अजूनही शेकडो लोक बेपत्ता आहेत.
 
आतापर्यंतर जवळपास २४१३ लोकांना वाचवण्यात यश आले असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी पुरात वाहून गेलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरुच आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121