आम्ही विरोधक आहोत, आम्हाला आरोप लावणं सोपं असतं

- नांदेड प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

    06-Oct-2023
Total Views | 22

Aditya Thackeray 
 
 
मुंबई : गोरेगावमधील सात मजली जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली होती. या घटनेची आमदार आदित्य ठाकरेंनी पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्ही विरोधक आहोत, आम्हाला आरोप लावणं सोपं असतं. पण आता आरोप करण्याची ही वेळ नाही. ज्या काही चौकशी असतील. त्यामध्ये दुर्घटना कशी घडली? कोणामुळे घडली? आग कशी विझली? हे सर्व माहीत पडेल. पण कितीही कोणी आरोप केले तरी आम्ही जबाबदार विरोधी पक्ष आहोत. आम्ही आज आरोप करणार नाही. जे काही चौकशीत समोर आणायचे असेल, ते आम्ही जबाबदारपणे आणू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, "या आगीत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ४० जण अजून जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रार्थना एवढीच आहे की जे जखमी आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत. अर्थात या घटनेची चौकशी होईल. कारवाई जी काही व्हायची आहे ती होईल. पण या घटनेतील सगळ्यांना धीर देणे हे आता महत्त्वाचे आहे." असं आदित्य ठाकरे म्हणाले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121