आई शीतला देवी

    19-Oct-2023
Total Views | 59
shitladevi

नवदुर्गांपैकी आजची पाचवी देवी शीतला माता. या देवीचे मंदिर मुख्यत्वे तीन ठिकाणी पाहायला मिळते. केळवे-माहीम, दादर माहीम आणि अलिबाग. ही देवता वाडवळ समाज, गौड सारस्वत ब्राह्मण समाज आणि आगरी-कोळी या समाजबांधवांची कुलदेवता आहे. तिच्या तीन मंदिरांविषयीचे रहस्य आजच्या लेखमालेत उलगडूया.

तीन मंदिरांमागील कथा

मंदिर ही एक सामाजिक संस्था असते. तिच्या भोवती संस्कृतीचे अनेक धागे गुंतलेले असतात. देवतेचे स्थान मध्यवर्ती असते. माणसे अनेक कारणाने स्थलांतर करतात, तेव्हा त्यांच्या श्रद्धेचे रूप असलेली दैवतेसुद्धा आपल्यासोबत नव्या ठिकाणी घेऊन जातात. केळवे-माहीम गावी समुद्रालगत असलेली, ही शीतलादेवी ही त्यापैकीच एक. या देवीचे मंदिर हे तेथील स्थानिक वाडवळ समाजाचे कुलदैवत. हा समाज किनारी मार्गाने पसरत गेला, तसे मुंबईतील माहीम येथे या देवीचे मंदिर बांधले गेले. याठिकाणी माहीम हे नाव मूळ केळवे-माहीम या गावावरून आले असावे, असा तर्क काढता येतो. तसेच मूळ महिकावती साम्राज्याची राजधानी म्हणून माहीम हे नाव प्रचलित झाले असावे, असा तर्कही नाकारता येत नाही. मुंबईतील माहीम येथे सारस्वत ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने या समाजाकडून देवीची पूजा-अर्चा होते, तर अलिबागमध्ये कोळी-आगरी समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथील या समाजाचीही शीतला माता कुलदैवत आहे.

मंदिराची वैशिष्ट्ये

देवीचे मंदिर म्हणजे ती केवळ भाविकांना आश्वस्त करत नाही, केवळ संरक्षण हे तिचे कर्तव्य नाही. ती शक्ती प्रदान करते. ऊर्जा देते, प्रेरणा देते. मंदिरासमोर प्राचीन दगडी पुष्करिणी आहेच, तरीही मंदिरात जाताना पाय धुवून जावे. शुचिर्भूत होऊन प्रवेश करावा, यासाठी संपूर्ण मंदिराभोवती पाण्याची पोहळी तयार केलेली आहे. प्रवेश करताना तिला लागूनच जावे लागते.
अग्रलेख
जरुर वाचा
एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एस.टी. बसेस बाबत वारंवार नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून शासनाकडे निवेदन वा तक्रार करुनही नवीन बस खरेदी व बस स्थानकामध्ये सुधारणा करण्याबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना व त्याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही, असा सवाल राज्याच्या विविध भागातील आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसेसची कमतरता भरुन काढण्यासाठी रा.प. महामंड..

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये आयटीआय संस्थाचे आधुनिकीकरण दरवर्षी ५०००-७००० तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन,एम.डी रुरल ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था सामंजस्य करारातंर्गत १२० कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक मधील सहा निवडक आयटीआय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121