भारताला दुसरा धक्का! अफगाणिस्तानविरुध्दच्या सामन्याआधीच भारताच्या स्टार खेळाडूला दुखापत

    11-Oct-2023
Total Views | 65
Indian Captain Rohit Sharma Get Injured in Net Practice

मुंबई :
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्ली येथे विश्वचषकाचा सामना खेळविला जाणार आहे. या सामन्याच्या आधीच सरावादरम्यान, भारताच्या प्रमुख खेळाडूला दुखापत झाली आहे. भारताचा कप्तान आणि स्टार फलंदाज रोहित शर्माला सरावादरम्यान दुखापत झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भारताला सामना सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.

वाचा सविस्तर >> टीम इंडियाला मोठा धक्का; सलामीवीर शुभमन गिल पुढील सामन्यातून बाहेर

इशान किशन, सुर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा हे तिघेही नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत होते. त्यावेळी रोहित शर्माला दुखापत झाली. रोहित शर्माच्या डाव्या मांडीला दुखापत झाली असून ही दुखापत झाल्यावर रोहित शर्मा अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले. पण सध्यातरी रोहित शर्माच्या या दुखापतीवर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे, गिल तंदुरुस्त नसल्यामुळे इशान किशनचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयने रोहित शर्माच्या दुखापतीबाबत कोणतीही अपडेट्स दिलेली नाही. त्यामुळे रोहित शर्माला झालेली दुखापत किती गंभीर आहे, याबाबत सध्यातरी अस्पष्टता आहे. दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात विश्चचषकाचा ९ वा सामना अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळविला जाणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121