"वारकरी परंपरा जोपासण्यासाठी मी सहकार्य करेन"

शरद पवारांचे वारकऱ्यांना आश्वासन

    15-Sep-2022
Total Views | 219

shacd 
 
पुणे : "वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासण्यासाठी माझ्याकडून जे काही सहकार्य करता येईल ते सर्व मी करेन" अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले. वारकरी संप्रदायाची परंपरा फार मोठी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून असलेल्या या परंपरेत वाईट शक्तींची घुसखोरी झाली आहे. त्यामुळे आपल्या परंपरेची बदनामी होते आणि हे संप्रदायासाठी घातक आहे असे वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने सांगितले. संप्रदायाच्या सुधारणांसाठी वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
 
 
वारकरी संप्रदायातील वाईट शक्तींची घुसखोरी रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एक कृतिशील कार्यक्रमच आखावा लागेल. हे घुसखोर वारकऱ्यांचा वेशात समाजात तेढ निर्माण करण्याचे काम ते लोक करत असतात. हे खूप घातक आहे, त्यामुळे या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी काय कार्यक्रम आणि काही चर्चासत्रे वगैरे असे काही कार्यक्रम आपल्याला घेता येतील का यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. असे शरद पवार आणि वारकरी संप्रदायाच्या चर्चेत ठरवण्यात आले. वारकऱ्यांची परंपरा महाराष्ट्रात टिकवण्याचे काम सध्या कीर्तनकारांच्या माध्यमातून होत आहे. हे कीर्तनकारच सध्या वारकऱ्यांची परंपरा पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठीही काहीतरी केले पाहिजे ही गरज वारकरी शिष्टमंडळाने बोलून दाखवली.
 
 
 
 
 
 
"महाराष्ट्राच्या गावोगावी जाऊन संतांचे खरे विचार पोहोचवणारे कीर्तनकार हे शेतकरी कुटुंबातून येतात. संताचे विचार टिकावेत, ते नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, नवीन पिढी व्यसनाधीनता किंवा अंधश्रद्धेकडे न झुकता संतांचे विचार आचरणात आणेल, यासाठी कृतिशील कार्यक्रम घेऊन पुढे जावे लागेल," अशा पद्धतीने पुढे जाण्याची गरज शरद पवारांनी बोलून दाखवली. अशा संदर्भाचे ट्विटही केले आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथे हिंदूंवर आणि पोलिसांवर देखील काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. येथील शिव मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध हिंदू समुदायाच्या लोकांनी निषेध केला असता कट्टरपंथींनी मंदिरावरही हल्ला करत मंदिर परिसराची देखील तोडफोड केल्याचे दिसतेय. दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली व परिसरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास येतेय. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली...

आता थांबायचं नाही! ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

"आता थांबायचं नाही!" ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

भावनिक आणि प्रेरणादायी अशा “आता थांबायचं नाही!” या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील श्रमिकांच्या संघर्षमय आणि स्फूर्तिदायक प्रवासावर आधारित असलेला हा चित्रपट सध्या IMDb वर ८.८ इतक्या उत्तम रेटिंगसह प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वैचळ यांनी केलं असून, त्यांनी याच चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. चित्रपटात भारत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि आशुतोष गोवारिकर यांच्या महत्त्वपूर्ण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121