'तारक मेहता...' मध्ये किरण भट्ट साकारणार 'नट्टू काका'

    04-Jul-2022
Total Views | 63

nattu kaka
 
 
मुंबई : गेली अनेक वर्षे फक्त हिंदीच नाही तर बहुभाषिक प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उलटा चश्मा'. गेले अनेक दिवस या मालिके बाबत सतत नवनवीन चर्चा सुरू आहेत. काही कलाकार मालिका सोडून जात आहेत तर काही नव्याने येत आहेत. त्यामुळे आता अशीच एक एंट्री होणार आहे ती नव्या 'नट्टू काका'ची. मागील एक वर्ष सर्वांनाच नट्टू काका या पात्राची कमी जाणवत होती. पण आता पुन्हा एकदा किरण भट्ट यांच्या रूपाने मालिकेत नवीन नट्टू काका येत आहेत. आता प्रश्न आहे हे किरण भट्ट नेमके कोण आहेत?
 
 
 
 
 
या मालिकेचे चाहते आजही 'नट्टू काका'ना म्हणजेच घनश्याम नायक यांना आजही विसरू शकले नाही आहेत. कारण तब्बल १३ वर्षे त्यांनी ही भूमिका साकारली होती. परंतु, कॅन्सरशी सामना करत गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी आता किरण भट्ट हे 'नट्टू काका'च्या भूमिकेत येत आहेत.
 
 
 
 
 
नट्टू काका या पात्राला साजेशी व्यक्तिरेखा शोधणे थोडे कठीण होते परंतु, निर्माते आसित मोदी यांनी ते शक्य करून दाखवले आहे. किरण भट्ट हे देखील गेली बरीच वर्षे ते रंगभूमीवर काम करत आहेत. किरण भट्ट यांनी आजवर नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप चाहत्यांवर पाडली आहे. ते अनेक वर्ष गुजराथी रंगभूमीवर सातत्याने काम करत आहेत. एवढेच नाही तर 'तारक मेहता' या मालिकेचे निर्माते असणाऱ्या असित मोदी यांनीही एकेकाळी किरण यांच्या हाताखाली काम केले आहे. 'मी जेव्हा नाटकात काम करत होतो, त्या दिवसांमध्ये किरण भट्ट हे माझे निर्माते होते' असे स्वतः असीत मोदी यांनी सांगितले आहे.
 
 
 
 
 
त्याचबरोबर या मालिकेतील अनेक कलाकारांचे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीयांनी देखील त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केले होते. स्वतः घनश्याम नायक आणि किरण भट्ट चांगले मित्र होते. तब्बल २० वर्षे या दोघांनी एकत्र एका गुजराथी नाटकांत काम केले होते. 'रंगीला' 'सत्या' चित्रपटांतून तर ''क्युकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून ते घराघरात पोहोचले आहेत. आता ''नट्टू काका' ही भूमिका साकारण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
जनतेला स्वस्त दरात अधिकाधिक वीज उपलब्ध करून देण्यासाठी

जनतेला स्वस्त दरात अधिकाधिक वीज उपलब्ध करून देण्यासाठी 'हरित ऊर्जा' प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ऊर्जा विभागाच्या योजनांची आढावा बैठक पार पडली. जनतेला स्वस्त दरात आणि अधिकाधिक वीज उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण असून, ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची मजबुती आणि हरित ऊर्जेचा व्यापक विस्तार हे आगामी काळातील केंद्रबिंदू असतील. यासाठी ऊर्जा विभागाने नियोजनबद्ध आणि कालबद्ध स्वरूपात प्रकल्पांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121