नवी दिल्ली: भारताच्या १५व्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दि. २५ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. भारताचे मुख्य न्यायमूर्ती रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना ही शपथ दिली. राष्ट्रपती पद स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून पहिले ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी कारगिल दिवस असल्याने कारगिल युद्धातील शहीद शूरवीर, जवानांना अभिवादन केले आहे.
“कारगिल विजय दिवस हा आपल्या सशस्त्र दलांच्या असामान्य शौर्याचे, पराक्रमाचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. भारत मातेच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शूर सैनिकांना मी नमन करते. तमाम देशवासी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सदैव ऋणी राहतील. जय हिंद!” असे द्रौपदी मुर्मू ट्विटमध्ये म्हणाल्या.