मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मास्क सक्ती पुन्हा होणार का? या संदर्भात चर्चा रंगली होती. आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी जिल्हाधिकार्यांना एक पत्र लिहून मास्क बाबतच्या सूचना केल्या होत्या. ज्यात बंदिस्त जागी मास्क परिधान करणे 'मस्ट' म्हणजे अनिवार्य असल्याचे सांगितले. परंतु आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या 'मस्ट' शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊ नका असे, आव्हान केले. 'मस्ट' या शब्दाचा वापर आवाहन करण्यासाठी केला असून, राज्यात मास्कची सक्ती नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
"इंग्रीजीमध्ये 'मस्ट' वापरल्याने तो सक्तीचा होत नाही. ते आवाहन आहे, बंदिस्त ठिकाणी १००% मास्क वापरला पाहिजे अशी कोणतीही सक्ती करण्यात आली नाही, तर एकप्रकारे आवाहन करण्यात आले आहे. त्या दृष्टिकोनातून १० ते १५ दिवस जी सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, त्या दृष्टिकोनातून जवळच्या ठिकाणी म्हणजेच बसेस, रेल्वे, शाळा, कार्यलये, या ठिकाणी मास्क वापरावा बाकी ठिकाणी मास्क बाबत शिथिलता आहे. तसेच मास्क परिधान केला नाही, तर दंडात्मक कारवाई होणार नाही", असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.