पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १९७ माजी न्यायाधीश, नोकरशहा आणि सैन्याधिकार्‍यांचा पाठिंबा

हिंसाचाराच्या राजकारणाचा बुरखा फाडण्याचे केले आवाहन

    01-May-2022
Total Views | 148
PM
 
 
 
 
नवी दिल्ली : देशातील हिंसाचार आणि त्यावरील पक्षपाती राजकारणावर देशातील विविध क्षेत्रातील १९७ माजी अधिकार्‍यांनी पंतप्रधान मोदींना खुले पत्र लिहिले आहे. देशात एका विशिष्ट अजेंड्याखाली होत असलेले पक्षपाती राजकारण स्वीकारता येणार नाही. त्यासाठी हिंसेचे राजकारण करणार्‍या लोकांना उघडे पाडणे गरजेचे आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. हे पत्र म्हणजे १०८ माजी नोकरशहांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेस प्रत्युत्तर असल्याचे मानले जाते.
 
 
 
मोदींना लिहिलेल्या या पत्रात माजी न्यायमूर्ती, निवृत्त अधिकारी आणि सशस्त्र दलातील माजी अधिकार्‍यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचारावर सीसीजीच्या मौनावर टीका केली आहे. त्यांच्या या वृत्तीमुळे त्यांच्या हेतूवर अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे पत्रात लिहिले आहे. याशिवाय, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि नवी दिल्ली येथे श्रीराम नवमी, हनुमान जयंती आणि इतर सणांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत सीसीजी गटाच्या मौनावर टीका करताना, सीसीजीच्या सदस्यांवर देश आणि समाजात फूट पाडण्याचा आरोपही करण्यात आला आहे. पत्र लिहिणार्‍यांमध्ये आठ निवृत्त न्यायाधीश, ९७ निवृत्त नोकरशहा आणि ९२ निवृत्त सैन्याधिकार्‍यांचा समावेश आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सर्वाधिक उंच पूल ; १२ मजली इमारतीच्या उंचीचा पूल प्रगतीपथावर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सर्वाधिक उंच पूल ; १२ मजली इमारतीच्या उंचीचा पूल प्रगतीपथावर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच म्हणजेच १२ मजली इमारतीइतक्या उंचीचा पूल सध्या अहमदाबादमधील साबरमती नदीवर बांधला जात आहे. एकूण ४८० मीटर लांबीचा हा पूल पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गालगत बांधला जात आहे. ज्याची उंची सुमारे १४.८ मीटर आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर, तो केवळ आधुनिक संपर्काचे प्रतीक ठरणार नाही तर हाय-स्पीड पायाभूत सुविधांमध्ये व अस्तित्वातील रेल्वे नेटवर्कमध्ये सुसंवाद कसा साधता येतो याचे उत्कृष्ट उदाहरणही ठरेल...

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121