नाशिक बस दुर्घटना : पंतप्रधानांकडून मदत जाहीर

तर मुख्यमंत्र्यांनी केली दुर्घटनास्थळाची पाहणी

    08-Oct-2022
Total Views | 52

Nashik Bus Fire
 
 
 
मुंबई : नाशिक बस दुर्घटना प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना मदतीचा ओघ सुरु झाला आहे. देशाच्या पंतप्रधानांकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी आणि जखमींसाठी मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख तर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आली आहे.
 
 
पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून याबाबत ट्विट करून ही घोषणा करण्यात आली आहे. आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की, 'नाशिक इथे झालेल्या बस अपघाताचे वृत्त व्यथित करणारे आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर बरे वाटू दे ही प्रार्थना. अपघातातील पीडितांना स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे. नाशिक बस आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पीएमएनआरफमधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसेच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.' अशी घोषणा पंतप्रधानांकडून करण्यात आली आहे.
 
 
नाशिक येथे झालेल्या बस आणि कंटेनरच्या अपघातानंतर बसला आग लागल्याची दुर्घटना शनिवारी पहाटे घडली. या अग्निकांडात बसमधील १२ प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन जळालेल्या बसची पाहणी केली असून जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एस.टी. बसेस बाबत वारंवार नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून शासनाकडे निवेदन वा तक्रार करुनही नवीन बस खरेदी व बस स्थानकामध्ये सुधारणा करण्याबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना व त्याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही, असा सवाल राज्याच्या विविध भागातील आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसेसची कमतरता भरुन काढण्यासाठी रा.प. महामंड..

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये आयटीआय संस्थाचे आधुनिकीकरण दरवर्षी ५०००-७००० तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन,एम.डी रुरल ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था सामंजस्य करारातंर्गत १२० कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक मधील सहा निवडक आयटीआय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121