भारताला पदक मिळून पुन्हा काढून घेण्यात आले, कारण...

भारताला पदक मिळून पुन्हा काढून घेण्यात आले, कारण...

    30-Aug-2021
Total Views | 301


vk_1  H x W: 0
 
 
मुंबई : एकीकडे भारताला २ सुवर्णसहित ८ पदके मिळाली असताना आता एक पदक काढून घेण्यात आले आहे. नुकतेच टोकियो पॅरालिम्पिकच्या आयोजन समितीने हा निर्णय जाहीर केला आहे. भारतीय थाळीफेकपटू विनोद कुमार यांनी एफ - ५२ गटात कांस्य पदक पटकावले. यानंतर विनोद कुमार हे या विभागातील नियमात बसत नसल्याचे सांगत प्रतिस्पर्धी खेळाडूंनी आपेक्ष नोंदवला. तेव्हा तपासाअंती त्यांच्याकडून कांस्य पदक काढून घेण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतला.
 
 
नेमके प्रकरण काय?
 
 
भारतीय खेळाडू विनोद कुमार यांनी रविवारी २९ ऑगस्ट रोजी १९.९१ मीटर लांब थाली फेकत कांस्य पदक पटकावले. तेव्हा प्रतिस्पर्धी खेळाडूंनी विनोद कुमार हे एफ़५२ गटाच्या विभागासाठी असलेल्या नियमांमध्ये बसत नसल्याचे सांगत आपेक्ष नोंदवला. तेव्हा आयोजन समितीने विनोद कुमार यांचे पदक राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. तपासामध्ये विनोद कुमार या कॅटिगरीसाठी पात्र ठरले नाहीत. तेव्हा आयोजन समितीने त्यांचे पदक काढून घेतले. यासंदर्भात भारताचे मिशन प्रमुख गुरशरण सिंग यांनीदेखील हे स्पष्ट केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमध्ये चिमुकल्यांची शाळा मालवाहतूक टेम्पोमधूनच सुरू

कल्याणमध्ये चिमुकल्यांची शाळा मालवाहतूक टेम्पोमधूनच सुरू

ना दरवाजे, ना अटेंडंट, ना सुरक्षा विद्यार्थी लोंखडीपट्टयांना धरून करतात प्रवास अंबरनाथ मधील अपघाताच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले असतानाच कल्याणात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून शाळेत ने-आण केली जात आहे. विशेष म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक ही अटेंडंट (सहाय्यक) सोबत नाही. विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू असताना आरटीओच्या अधिकाऱ्याचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतरच जाग येणार का असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121