वेतन मिळत नसल्याने एसटी कर्मचारी हवालदिलअनिल परबांचे एसटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष?, फडणवीसांचे पत्र

वेतन मिळत नसल्याने एसटी कर्मचारी हवालदिल अनिल परबांचे एसटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष?, फडणवीसांचे पत्र

    30-Aug-2021
Total Views | 66
 letter_1  H x W 
 
 
 वेतन मिळत नसल्याने एसटी कर्मचारी हवालदिल 

मुंबई : राज्यातील ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे उघड झाले आहे. वेतन मिळत नसल्याने एसटी कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
दर महिन्याला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार सात तारखेला होत असतो. गेले दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार उशिरा होत आहे. ऑगस्ट संपत आला तरीही पगाराची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे.
कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्यासाठी संघटनेने अनेकवेळा मंत्री अनिल परब यांना निवेदन दिले होते. तरीही एसटी कर्मचाऱ्यांकडे परब यांचे दुर्लक्ष होत आहे. नाईलाजाने एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे सुरू केले आहे.
अहमदपूर, तेल्हारा, शहादा, कंधार आणि साक्री अशा अनेक ठिकाणी एस.टी. कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. नाशिक आणि इतरही भागात त्यानंतर आत्महत्यांचे सत्र सुरूच राहिले. या घटनांनी राज्यभरात एसटी कर्मचार्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे,” असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्याचे वेतनासंदर्भात प्रश्न सोडवण्यात यावा यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
कोकणचा आर्थिक विकास, शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकारने ‘वॉटर ग्रीड’ तयार करावे : आ. प्रविण दरेकर यांची मागणी

कोकणचा आर्थिक विकास, शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकारने ‘वॉटर ग्रीड’ तयार करावे : आ. प्रविण दरेकर यांची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी “मराठवाडा वॉटर ग्रीड” संकल्पना मांडली, त्यावर कामही सुरू आहे. वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे ६७ टीएमसी पाणी वीज निर्मितीनंतर बोगद्यातून वशिष्ठ नदीला सोडले जाते आणि हे पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. हे ६७ टीएमसी पाणी जर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला मिळाले, पाईपलाईनद्वारे हे पाणी तिन्ही जिल्ह्यात फिरवले तर कोकणातील पाणीटंचाई कायमची दूर होईल. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणे कोकणच्या समृद्धीसाठी कोकण वॉटर ग्रीड होणे अत्यंत गरजेचे आहे. कोकणाच्या आर्थिक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121