मुघल आणि इंग्रजांनी दडपला इतिहास : अजय देवगण

    16-Aug-2021
Total Views |

Ajy Devgan_1  H
मुंबई : १९७१मध्ये झालेल्या ऐतिहासिक भूजच्या भारत पाकिस्तान युद्धावर आधारित 'भूज - दि प्राईड ऑफ इंडिया' हा चित्रपट नुकताच 'डिस्ने प्लस हॉटस्टार' या ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने अजय देवगणने एका मुलाखतीत म्हंटले की, "भारताचा खरा इतिहास समोर येणे खूप गरजेचे आहे. कारण मुघल आणि इंग्रजांकडून हा इतिहास दडपण्यात आला होता आणि आताच्या पिढीला हे माहिती असणे गरजेचे आहे की देश कोणाच्या बलिदानावर उभा आहे."
 
 
 
याआधी मागील वर्षी त्याने 'तान्हाजी' हा चित्रपट घेऊन येत शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे एक पान उलगडले होते. तर आता भूज्वरील भारत पाकमध्ये झालेल्या युद्धाचे पान उलगडले आहे. "इतकी वर्षं इंग्रज होते त्यांनी इतिहास दडपला. लोकांना कळले असते की इतक्या लोकांनी बलिदान दिले आहे तर लोकांनी बंड पुकारले असते. त्यांच्याआधी मुघलांचा प्रभाव होता. मुघलांच्या आधी आपल्या राजांनी जे केले ते सुद्धा दडपले."
 
 
 
"आमच्या काळात 'तान्हाजी'वर फक्त अर्ध पान लिहिलं गेलं होते आणि आजच्या पिढीला तानाजीबद्दल माहिती नाही कारण ती पुस्तकांमध्ये अधिक उपलब्ध नाही. मला वाटतं आपण त्याबद्दल बोलायला हवे. कारण जेव्हा देशाचा विचार केला जातो, लोक जेव्हा बदलतील तेव्हाच देश बदलेल. या पिढीला हे माहिती नाही की किती लोकांच्या कठोर परिश्रमाने आणि निःस्वार्थ बलिदानामुळे हा देश उभा राहू शकला. किती कष्टाने स्वातंत्र्य मिळाले आहे? हे जेव्हा कळेल, तेव्हाच त्याला महत्त्व दिले जाईल."
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121