डोंबिवली :रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हा बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष संपूर्ण भारतात भाजप सोबत काम करीत आहे. कल्याण डोंबिवलीतही भाजपसोबत युती करण्याचा आमचा विचार आहे. पण भाजपने आमच्याशी सन्मानपूर्वक युती करावी. भाजपची शिवसेनेशी युती तुटली आहे. भाजपाला महाराष्ट्रात आपला महापौर निवडून आणण्यासाठी रिपाईच्या मदतीची गरज असल्याचे मत रिपाईचे केंद्रीय निरीक्षक सुरेश बारसिंगे यांनी व्यक्त केले आहे.
रिपाईचे डोंबिवली शहर अध्यक्ष अकुंश गायकवाड यांनी एका कार्यक्रमाचे डोंबिवलीत आयोजन केले होते. त्या कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीत आले असताना बारसिंगे यांनी पत्रकारशी संवाद साधला. बारसिंगे म्हणाले, सर्व राज्यात रिपाई पक्ष पसरलेले आहे. महाराष्ट्र रिपाईची कर्मभूमी आहे. मुंबई आणि मुंबईचा परिसर याठिकाणी रिपाईची ताकद मोठी आहे. या शहरातील कोणत्याही पक्षाचा महापौर रिपाईच्या मदतीशिवाय निवडून येऊ शकत नाही. मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल महापालिका अशी कोणतेही महापालिका असू दया त्याठिकाणी रिपाईच्या मदतीने महापौर बसत असतो. लोकसंख्येच्या तुलनेने रिपाईला मानणा:या वर्गाने महापौरपदी आमचा माणूस बसला पाहिजे असा विचार केला तर तोच महापौर होतो ही ताकद आहे. हीच ताकद कल्याण-डोंबिवलीतही आहे. रिपाईचे राष्ट्रीय पातळीवर गठबंधन भाजप सोबत आहे. रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले हे केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे भारतभर ज्या निवडणूका होत आहे त्यात आम्ही भाजप सोबत आहोत.
दिल्ली येथे नुकतीच बैठक झाली त्यामध्ये सुध्दा येत्या निवडणूकीत आम्ही भाजपाला मदत करणार आहोत असा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपने देखील आमचा योग्य तो सन्मान राखावा. ब:याच वेळाला प्रस्तावित पक्ष ज्यांच्यामध्ये ताकद मोठी आहे. ते पक्ष आमच्या पक्षाकडे कानाडोळा करतात. आमच्या पक्षातील तरूणांना वाव देत नाही. येत्या निवडणूकीत जास्तीत जास्त नगरसेवक रिपाईचे आले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. भाजप आणि शिवसेना युती तुटल्याने रिपाई हाच पर्याय भाजपकडे आहे. भाजप आम्हाला सोबत घेईल असे वाटत आहे. पण तरीही भाजपने आम्हाला सोबत घेतले नाही तर आपली भूमिका काय असावी याची चाचपणी आम्ही करीत आहोत, असे ही त्यांनी सांगितले.
निवडणूकीत भाजपसोबत युती न झाल्यास रिपाई स्वबळावर लढणार
निवडणूकीत भाजपने रिपाईला सोबत घेतले नाही तर आम्ही दुस:या कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. रिपाई स्वबळावर निवडणूक लढवेल. भाजपला मनसे सोबत युती करण्याची इच्छा असेल तरी आमची त्यावर कोणतीही हरकत नसेल. मात्र रिपाईला मान दिला जावा एवढेच अट आहे. भाजप या निवडणूकीत रिपाईला जास्तीत जास्त जागा देतील असे आम्हाला वाटत आहे.
भाजपच्या चिन्हाचा रिपाईला यापूर्वी ही झाला फायदा
रिपाईने २५ फेब्रुवारीला भूमी बचाव आंदोलन ठेवले आहे. त्यानंतर विभागवार बैठक चालू होणार आहे. पक्षात सध्या तिकीट कोणते घ्यायचे आहे यावर चर्चा आहे. याबाबत दोन मतप्रवाह आहे. बहुसंख्य कार्यकत्र्याना आपले तिकीट घ्यावे तर काहींना आपल्या तिकीटावर माणूस निवडून येऊ शकत नाही तर भाजपचे तिकीट घ्यावे असे वाटत आहे. भाजपच्या चिन्हाचा फायदा आम्हाला झाला आहे. नाशिक, पुणो याठिकाणी केले आहे. कल्याण-डोंबिवलीत ही भाजप चिन्हाचा वापर करता येईल. हा विचार अजून निश्चित केला नाही. पण युती मान-सन्मानाने झाली पाहिजे.
बाबासाहेबांनी ज्यांच्यासाठी काम केले तेच त्यांच्या विचारांपासून लांब आहेत
रिपाईची जडणघडण पूर्णत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आहे. बहुजन समाजाला आमच्याकडे आणण्यासाठी काही मर्यादा येत आहे. त्यासाठी ४४ ते ४५ वर्षापासून मी काम करीत आहे. आमच्या पक्षाची भूमिका कायम डॉ. आंबेडकर यांच्या स्वप्नातील रिपबिल्कन पक्ष घडावायचा आहे. देशाला जे महासत्ता बनवेल. जाती धर्म विरहित सर्वाना समान संधी मिळेल तो भारत घडवायचे. त्याला आम्हाला यश मिळत नाही. बाबासाहेबांनी ज्यांच्यासाठी काम केले ते लोक सुध्दा त्यांच्या विचारांपासून लांब आहेत. महिलांसाठी हिंदू कोडबिलमध्ये विविध हक्क व वाईट चालरितीपासून दूर करण्याचे काम केले आहे. कामगारांसाठी मोठे काम केले आहे. पण त्यांचे मतदान रिपाईला होत नाही. देशाला एकत्रितपणो कसे बांधून ठेवायचे हे त्यांनी पाहिले आहे. आपला देश अनेकदा आक्रमणाला बळी पडला आहे. कारण त्यात एकता नव्हती. हा देश जाती धर्मात विभागला गेला होता. त्याला बाबासाहेबांनी त्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला. सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन पुढे गेले पाहिजे. आमच्यामध्ये बहुसंख्य लोक नोकरीला जात आहे. आमच्याच लोकांर्पयत फार आम्हाला पोहोचता आले नाही. बहुजन समाज, आदिवासी समाज हे मित्र आम्ही टिकवू शकलो नाही. आमचा मूळ हेतू समाजकारण असल्याने राजकारण करता येत नाही.
भाजपशी युती न झाल्यास सर्व जागा लढविणार
आमच्या पक्षाला काही मर्यादा येतात. भाजपसोबत जाताना जनता तुम्ही भाजप सोबत कसे गेला असे बोलतात. कोणत्याही स्पर्धेत आधी सामावून जा मग हक्कांसाठी भांडू. भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्याशी आमची बोलणी सुरू आहे. भाजपच्या चिन्हाचा फायदा होण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत जाणार आहोत. भाजप ने आम्हाला ३५ जागा दयाव्यात. भाजप व रिपाई युती झाली नाही तर १२२ सर्वच जागा आम्ही लढणार आहोत. रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी डोंबिवली शहर कार्याध्यक्ष माणिक उघडे यांची पाच वर्षाकरिता कार्याध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे . त्यावर बारसिंगे यांना छेडले असता त्यांनी रिपाई पक्षात गटबाजी असली तरी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊ. अन्याय कोणावरही होणार नाही हे पाहू. माणिक उघडे यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही.आणि जिल्हाध्यक्षांचे काय मत आहे ते देखील आपण पाहू.