१२ ख्रिस्ती कुटूंबियांनी स्वीकारला हिंदू धर्म

आणखी २२ कुटूंब करणार "घरवापसी"!

    27-Dec-2021
Total Views | 285


Nashik _1


औरंगाबाद : पैठणच्या नाथ मंदिरात शनिवार, दि. २५ डिसेंबर रोजी १२ ख्रिस्ती कुटूंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. १२ कुटूंबातील एकूण ५३ जण या सोहळ्याला उपस्थित होते. ब्राह्मण सभेने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. पैठणच्या वेदशास्त्र संपन्न पंडितांनी हिंदूधर्म शास्त्रानुसार हे कार्य संपन्न केले, अशी माहिती दिली.


नाथवंशज आणि धर्मजागरण विभागाच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. जालन्यातील मंठा येथे १२ कुटुंबांतील ५३ महिला आणि पुरुषांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारता येईल का?, अशी इच्छा व्यक्त केली होती. स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारायचा असल्याने ब्राह्मणसभेने पुढाकार घेत विधी करण्याचे नियोजन करण्यात आले.


तसेच नाथमंदिरातील शांतीब्रम्ह नाथमहाराजांच्या समाधीपुढे हा सोहळा पार पडला. “संत एकनाथ महाराजांचे १४ वे आणि १५ वे वंशज, पैठणचे वेदशास्त्र संपन्न ब्रम्हवृंद यांची यावेळी उपस्थिती होती”, असे पैठण ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश कमलाकर शिवपुरी यांनी सांगितले.


हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या सर्व परिवारांचे स्वागत आणि पूजन हभप नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी, नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी (पालखीवाले) आणि किर्तनमहर्षी प्रफुल्लबुवा तळेगावकर महाराज यांनी केले.

आणखी २२ कुटुंबांनी व्यक्त केली इच्छा...


मंठा या ठिकाणच्या अन्य २२ ख्रिश्चन कुटुंबातील ६५ जणांनी हिंदू धर्मात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या इच्छेनुसार येत्या ५ जानेवारी रोजी धार्मिक मुहुर्तावर पैठणच्या नाथमंदीरातच या कार्याचे आयोजन केले आहे. यातही ब्राह्मणसभा पुढाकार घेणार असल्याची माहिती आहे.




अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121