समीर वानखेडेंना बदनाम करण्यासाठी दिली अर्धवट माहिती

नवाब मालिकांच्या दाव्यावर क्रांती रेडकरचे उत्तर

    18-Nov-2021
Total Views | 505

Kranti Redkar_1 &nbs
मुंबई : महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर नवाब मालिकांनी, 'समीर वानखेडे हे मुस्लीम असून त्यांनी खोटे जात प्रमाणपत्र दाखवला असल्याचा दावा केला. यावर मलीकांनी वानखेडेंच्या धर्माबद्दल माहिती देण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला समोर आणला. मलिक यांनी हे प्रमाणपत्र देऊन पुन्हा एकदा वानखेडे मुस्लिम असल्याचा आरोप केला. मात्र, यावर वानखेडे यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने, "समीर वानखेडेंना बदनाम करण्यासाठी दिली अर्धवट माहिती दिल्याचा आरोप केला आहे.
 
 
 
 
क्रांती रेडकरने नवाब मलिकांच्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी काही कागदपत्रे ट्विटवर पोस्ट केली आहेत. तसेच, समीर वानखेडेंची बदनामी करण्यासाठी अर्धवट माहिती दिली असल्याचे क्रांती रेडकरने म्हंटले आहे. “समीर वानखेडे यांची बदनामी करण्यासाठी वाईट विचारांच्या लोकांनी अर्धवट माहिती समोर आणली आहे. एक चूक झाली होती. नंतर त्याची रीतसर दुरुस्ती ज्ञानदेव वानखेडेंनी १९८९मध्ये सर्व कायदेशीर औपचारिकता आणि प्रक्रियांसह केली होती. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व कागदपत्रे स्वीकारली आणि पडताळली आहेत.” असे तिने सांगितले आहे.
 
 
 
 
 
पुढे तिने आणखी काही कागदपत्रे जोडली असून म्हंटले आहे की, "समीर वानखेडे यांचे नाव बदनाम करण्यासाठी डाव रचले जात आहेत. सर्वांनी दिलेल्या पत्रातील मजकूर आणि आरोप केलेल्या सूर्यवंशी यांनी सादर केलेल्या मजकुराची पडताळणी करावी. एका बाब अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे एका प्रामाणिक अधिकाऱ्याला कलंकित करण्यासाठी काही आपल्या समाजातील काही लोक किती खालच्या थराला जातील?" असे म्हणत तिने नवाब मालिकांना तसेच वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथे हिंदूंवर आणि पोलिसांवर देखील काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. येथील शिव मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध हिंदू समुदायाच्या लोकांनी निषेध केला असता कट्टरपंथींनी मंदिरावरही हल्ला करत मंदिर परिसराची देखील तोडफोड केल्याचे दिसतेय. दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली व परिसरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास येतेय. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली...

आता थांबायचं नाही! ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

"आता थांबायचं नाही!" ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

भावनिक आणि प्रेरणादायी अशा “आता थांबायचं नाही!” या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील श्रमिकांच्या संघर्षमय आणि स्फूर्तिदायक प्रवासावर आधारित असलेला हा चित्रपट सध्या IMDb वर ८.८ इतक्या उत्तम रेटिंगसह प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वैचळ यांनी केलं असून, त्यांनी याच चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. चित्रपटात भारत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि आशुतोष गोवारिकर यांच्या महत्त्वपूर्ण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121