मुंबई : राज्याचे कौशल्य विकास व अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्स प्रकरणी अटक केली आहे.यानंतर यावर विरोधकांनी ,मलिक जवाब दो म्हणत नवाब यांच्या नाकी नऊ आणले व नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री म्हणून नवाब मलिक सध्या आहेत ,मात्र त्यांचा जावई वेगळच कौशल्य दाखवतोय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे .
अमली पदार्थ विक्री आणि दलालीमध्ये नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने बुधवारी राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केली आहे. समीर खान यांचा नवाब मलिक यांची मुलगी निलोफर हिच्याशी लग्न झाल आहे.एनसीबी गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणाचा शोध घेत आहे. त्यातचं काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर करण सजनानीला अटक केली होती. त्याच्याकडून २०० किलो गांजाही एनसीबीने जप्त केला. करण सजनानीच्या चौकशीतून समीर खान यांचं नाव समोर आलं आहे. समीर खान आणि करण सजनानी यांच्यात 'गुगल पे'च्या माध्यमातून २० हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे ड्रग्ज पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाल्याचा एनसीबीला संशय आहे. यासंदर्भात एनसीबीने समीर खान याची १३ जानेवारी जवळपास दहा तास चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली आहे व आता नवाब यांचा जावयला १७ जानेवारीपर्यंत कस्टडी आहे. त्यामुळे थेट मंत्र्यांचा जावई असं करू लागल्याने, हे काय कौशल्य विकास राज्याचे करतील असं म्हणत विरोधक आक्रमक झाले आहेत ते नवाब यांच्या देखील राजीनाम्याची मागणी करत आहेत.
नवाब मलिक यांनी यावर कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. आणि कायदा सगळ्यांना कायदा समानच लागू केला गेला पाहिजे. या प्रकरणीही कायदा आपल्या पद्धतीने काम करेल आणि न्याय होईल. माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास असून आदर आहे असे म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादीचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणावर म्हटले की जर नवाब मलिक यांच्या जावयानं काही गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. चौकशीतून सर्वकाही स्पष्ट होईल व पुढील कारवाई होईल. त्यात राज्य सरकारचा हस्तक्षेप करणार नाही आणि तसाही प्रश्नच येत नाही,' मात्र, 'जावयाचं कुटुंब स्वतंत्र असतं. जावयानं काही गुन्हा असेल तर सासऱ्याच्या राजकीय कारकीर्दीवर परिणाम होण्याचं कारण नाही असे पाटील म्हणाले.
पण भाजप नेत्यानी कौशल्य विकास मंत्री यांचे जावई जर असं करत असतील तर राज्यात काय संदेश जाईल असे आक्रमक होत भाजप नेत्यांनी प्रश्न विचारले आहेत. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना त्यांच्या जावयावरील एनसीबीच्या कारवाईवरुन चांगलंच घेरलं आहे. नवाब मलिक मंत्री आहेत म्हणून त्यांच्या जावयाने काहीही करावं का?कायद्यानुसार कारवाई होत असेल, तर त्यात राजकारण कशाला आणता? आरोप गंभीर आहेत तर त्या दृष्टीने तपास करून कारवाई व्हायलाच पाहिजे असे मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.तसेच नवाब मलिक यांचे जावई आणि ‘ड्रग्जचा लॉर्ड’ समीर खान यांना एनसीबीने अटक केली आहे. आता मलिक यांनी ठाकरे सरकारमधून पायउतार व्हावे, अशी मागणी देखील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.