बाबरी वादग्रस्त ढाँचा निकाल : आजचा दिवस ठरणार ऐतिहासिक

    30-Sep-2020
Total Views | 43
babari_1  H x W



लखनऊ : अयोद्धेत राम मंदिर निर्माणाची तयारी जोरात सुरू झाली आहे. तिथेच आता वादग्रस्त ढाचा पाडण्या प्रकरणी निकाल बुधवारी लागणार आहे. २८ वर्षांपूर्वी ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी वादग्रस्त ढांचा पाडला. यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ४८ जणांवर आरोप ठेवण्यात आला. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ३२ आरोपींच्या पुढील कारवाईवर आज निकाल येऊ शकतो. 
पहिल्यांदा एफआयआर 198/92प्रियवदन नाथ शुक्ल यांनी सायंकाळई ५.१५ वेळी वादग्रस्त ढाचा पाडल्या प्रकरणी अज्ञात लोकांविरोधात 395, 397, 332, 337, 338, 295, 297 आणि 153ए मध्ये गुन्हा दाखल झाला होता. दूसरी एफआयआर क्रमांक 198/92 इंचार्ज गंगा प्रसाद तिवारी यांच्यातर्फे अन्य आठ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यात भाजपचे तत्कालीन प्रमुख नेते लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, डॉ. मुरली मनोहर जोशी, खासदार बजरंग दल प्रमुख विनय कटियार, तत्कालीन विश्व हिंदू परिषद महासचिव अशोक सिंघल, साध्वी ऋतंभरा, विष्णु हरी दालमिया आणि गिरिराज किशोर यांचा सामावेश होता.
 
 
त्यानंतर जानेवारी 1993 मध्ये 47 अन्य प्रकरणी खटले दाखल करण्यात आले आहेत. ज्यात पत्रकारांना झालेली मारहाण लूटमारी, असे खटले आहेत. 1993 मध्ये हाईकोर्टाच्या आदेशानुसार, विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले. त्यात 197/92 ची सुनावणी झाली. त्यात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, 120बी कलम लावण्यात आले. मूळ एफआयआरमध्ये हे कलम लावण्यात आले नव्हते. ऑक्टोबर 1993 रोजी सीबीआयने आपल्या चार्जशीटमध्ये 198/92 खटला दाखल करून संयुक्त चार्जशीट दाखल केली होती.
 
 
त्या आरोप पत्रात बाळासाहेब ठाकरे, नृत्य गोपाल दास, कल्याण सिंह, चम्पत राय यांच्यासारखी ४८ नावे होती. ही एकूण अडीच हजार पानांची चार्जशीट होती. तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारच्या एका चुकीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी सुनावणी झाली. 1993 मध्ये सीबीआयतर्फे संयुक्त चार्जशीट दाखल झाली त्यावेळी आडवाणींसह अन्य जणांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
 
आडवाणी-उमा भारतींसह पाच जण उपस्थित राहणार नाही
 
वादग्रस्त ढाचा प्रकरणातील लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, शिवसेनेचे खासदार राहिलेले सतीश प्रधान, श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास हे उपस्थित राहणार नाहीत. त्याशिवाय माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह कोर्ट न्यायालयात हजर झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती ठिक नसल्याने ते उपस्थित राहणार नाहीत.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121