दिल्ली हिंसाचार प्रकरण : जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालीदला अटक

    14-Sep-2020
Total Views | 54

Umar Khalid_1  
 
नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचार प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालीद याला अटक केली आहे. उमरवर बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंसाचार प्रकरणी त्याला रविवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. यावेळी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली असून त्याचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली हिंसाचाराचा कट रचल्याचा तपास पोलिसांचे विशेष पथक करत आहे. त्यासाठी याआधीही उमर खालिदवरची चौकशी झाली होती. या चौकशी दरम्यान, उमर खालिद हिंसाचाराबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. इतकेच नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्यारपूर्वी दिलेल्या भाषणाबद्दलही उमर खालिदची कसून चौकशी करण्यात आली होती.
 
 
यूनायडेट अगेंस्ट हेट संस्थेचे वकील तमन्ना पंकज यांनी उमर खालिदला अटक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणातील एफआयर ५९ मध्ये यूएपीए अंतर्गत बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या कलमांअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121