पंतप्रधान मोदी करणार गरीब कल्याण रोजगार अभियानाचे उद्घाटन!

    18-Jun-2020
Total Views | 36

GArib Kalyan rojgar _1&nb


स्थलांतरीत मजूरांसह ग्रामीण भागांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा उद्देश


नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे अनेक मजूर बेरोजगार झाले. या स्थलांतरित मजूरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘गरीब कल्याण रोजगार अभियाना’चे २० जून रोजी उद्घाटन करणार आहेत. या अभियानाची सुरुवात बिहारच्या तेलीहार गावापासून होणार आहे. या व्हर्च्युअल लॉन्चिंग कार्यक्रमात पाच राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे संबंधित मंत्री सहभागी होणार आहेत.


ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम देण्याचे लक्ष्य ठेऊन पंतप्रधान मोदींकडून २० जून रोजी गरीब कल्याण रोजगार अभियानाची सुरुवात होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे या योजनेचे उद्घाटन होणार आहे. बिहारच्या खागरिया जिल्ह्यातील तेलीहार या खेड्यातून या योजनेला सुरुवात होईल. या योजनेचा स्थलांतरीतांना फायदा होणार आहे. स्थलांतरीतांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही योजना आहे.


देशाच्या ६ राज्यातील ११६ जिल्ह्यांतील गावांमध्ये ही योजनेच्या माध्यमातून रोजगारनिर्मित्ती होईल. या योजनेतून २५ विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतील. तर, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड आणि ओडिशा या राज्यातील स्थलांतरीत नागरिकांना रोजगार देण्याचे काम प्राथमिक स्तरावर होणार आहे. त्यामध्ये जवळपास २५ हजार स्थलांतरीतांना काम मिळेल. पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.









अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121