मुंबईमध्ये दारोदारी जाऊन कोरोना चाचणी करणे अशक्य : उच्च न्यायालय

    12-May-2020
Total Views | 42

mumbai_1  H x W
 
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता मुंबईमध्ये दारोदारी जाऊन कोरोनाची स्क्रीनिंग करण्यात, यावी अशा प्रकारची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती. यावर हे शक्य नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. धारावी सारख्या अनेक झोपडपट्टी भागामध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे. धारावीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ९६२ रुग्ण आढळून आले असून यापैकी ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
 
मुंबईच्या झोपडपट्टी परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशामध्ये मुंबईमध्ये भिलवाडा पॅटर्नप्रमाणे डोअर टू डोअर स्क्रीनिंग करण्यात यावे, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. यावेळी न्यायालयाने म्हंटले की, मुंबईतील लोकसंख्येची तुलना भिलवाड्याशी होऊ शकत नाही. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची चाचणी करणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ‘फेक नरेटिव्ह’ - कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण; भाजप नेत्यांनी केली उबाठा-मनसे मोर्चामागील ‘राजकारणा’ची पोलखोल

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ‘फेक नरेटिव्ह’ - कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण; भाजप नेत्यांनी केली उबाठा-मनसे मोर्चामागील ‘राजकारणा’ची पोलखोल

“हिंदी सक्तीच्या मुद्दयावरून राज्यात फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, यासंदर्भातील वस्तुस्थिती जनमानसात आता पोहचत आहे. कारण कोणतीच बाब लपलेली नाही, कागदावरील सर्व बाबी उघड होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच त्रिभाषा धोरणाच्या पद्धतीला मान्यता देण्यात आली होती. उलट तेव्हा असलेला ‘अनिवार्य’ हा शब्द हटवून हिंदीची सक्ती या सरकारने काढून टाकली आहे. त्यामुळे खरेतर फडणवीस सरकारचे ठाकरेंनी अभिनंदन केले पाहिजे”, असा टोला भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121