मुंबईत लॉकडाऊनमध्ये भर रस्त्यात गोळीबार

    23-Apr-2020
Total Views | 54

Mahim_1  H x W:



गोळीबार प्रकरणी माहीम पोलिसांकडून दोघांना अटक


मुंबई : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र या दरम्यान गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाल्याचे दिसत आहे. मुंबईत लॉकडाऊनदरम्यान गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. माहिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गोळीबार झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.


माहिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री ९ च्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. माहिमच्या वीर सावरकर मार्गावर जैतून कपांऊड या ठिकाणी ही घटना घडली. यावेळी रिझवान बेग या व्यक्तीने आसिफ नावाच्या एका व्यक्तीवर गोळीबार केला. रिझवान बेग हा माहिम दर्गा ट्रस्टी सोहील खंडवाणीचा निकटवर्तीय आहे.


या गोळीबारानंतर पोलिसांनी वीर सावरकर मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. तसेच घटनास्थळी पंचनामा सुरु आहे. हा गोळीबार वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121