दिल्लीतील प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ; कोरोनामुळे खबरदारी

    05-Mar-2020
Total Views | 60

corona_1  H x W




नवी दिल्ली 
: देशात कोरोना विषाणूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३० वर पोहोचली आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, हा रुग्ण मध्यमवयीन असून नुकताच इराणला गेला. मागील आकडेवारीत केरळमध्ये तीन घटना समोर आल्या होत्या. परंतु हे रुग्ण बरे होऊन पुन्हा घरी परतले आहे. भारतात पॉझिटिव्ह आढळलेले ३० पैकी १६ जण इटलीचे पर्यटक आहेत.

दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद राहतील


दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जाहीर केले की दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा (सरकारी व खासगी) ३१ मार्चपर्यंत बंद राहतील. यासह दिल्ली सरकारने आपल्या कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेता सरकारने असे करण्याचा निर्णय घेतला आहे.



आतापर्यंत किती रुग्ण पॉझिटिव्ह


गाझियाबादमध्ये एक नवीन प्रकरण समोर आले आहे. दिल्लीत अद्याप कोरोना विषाणूचे एक पॉझिटिव्ह प्रकरण समोर आले आहे. मात्र, इटलीतील १६ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याशिवाय आग्रामध्ये सहा, गुरुग्राममधील एक, केरळमधील तीन, जयपूरमधील एक आणि तेलंगणात एक रुग्ण आढळला.
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121