रा स्व संघाच्या शाखेत मुलांचे व्यक्तिमत्व घडते : मिलिंद सोमण

    11-Mar-2020
Total Views | 926

milind soman _1 &nbs


मुंबई : सुपरमॉडेल मिलिंद सोमण यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुने संबंध असल्याचे समजताच डाव्या संघटनांचा एक मोठा वर्ग त्यांचा विरोध करत आहेत. नुकतेच त्यांचे 'मेड इन इंडिया - ए मोमॉयर' हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. सोमण यांच्याबरोबर लेखक रूपा पै यांनी सह-लेखन केले. त्यांनी या पुस्तकावरील चर्चेदरम्यान सांगितले की, जेव्हा ते दहा वर्षांचे होते तेव्हा ते नियमितपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात असत. मिलिंद मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये मोठे झाले, तेथे बरीच मुले संघ शाखेत जात असत. मात्र त्यांच्या या अनुबंधावांमुळे मात्र डाव्यांना चांगलाच पोटशूळ उठला आहे.



मिलिंद म्हणाले की, "ते राजकारणात नव्हते किंवा त्यांच्या कुटूंबातील कोणीही राजकारणात नव्हते परंतु त्यांचे वडील नियमितपणे रा. स्व. संघ शाखेत जात असत." मिलिंद सोमण यांनी संघाचे कौतुक करणारे आपले काही अनुभव सांगितले :
त्यावेळी मी १० वर्षांचा होतो आणि मी खेळामध्ये सहभाग घ्यायचो आणि शिस्तीत राहायला शिकलो. मी संघ शाखेसह दोन किंवा तीन शिबिरांमध्ये जात होतो, जिथे माझ्यासारखे हजारो मुले येत असत. चांगले नागरिक कसे व्हायचे, स्वावलंबी कसे व्हावे हे आम्हाला त्याच वेळी सांगण्यात आले. त्यावेळी मी शिकलो जी शिस्त मला लागली ती पाळत आहे. "



मिलिंद सोमण यांनी असेही सांगितले की
,'रा. स्व. संघाच्या सानिध्यात असताना कुठेही वाटले नाहीत की ही संघटना राजकीय आहे. इथे मला कुठेही राजकारण दिसले नाही. ते म्हणाले की, ते संघातील ज्या लोकांशी परिचित होते, ज्यांना भेटायचे तेही कधी राजकारणी वाटत नव्हते. तथापि नंतर ते म्हणाले की, संघ परिवार कालांतराने राजकीय संघटनांत्मक झाला असेल.' पुढे मिलिंद सोमण म्हणाले की, त्यांच्या वडिलांचा असा विश्वास होता की संघ शिबिरात जाऊन त्यात सहभाग घेतल्याने एका लहान मुलामध्ये शिस्त, जीवनशैली, फिटनेस आणि विचारसरणीत बरेच सकारात्मक बदल घडतात. यामुळे मात्र डाव्या संघटनांनी मिलिंद सोमण यांना सोशलमिडीयावर ट्रोल केले.


अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121