टीम इंडियाची नवी भिंत ; रहाणेची 'अजिंक्य' खेळी

    27-Dec-2020
Total Views |

Ajinkya Rahane_1 &nb
मेलबर्न : बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला १९५ धावांत रोखल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाअखेर ५ बाद २७७ धावा केल्या आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणे १०४ तर रविंद्र जडेजा ४० धावांवर खेळत आहे. संघ अडचणीत असताना, रहाणेने कर्णधाराला साजेशी खेळी करत शतक झळकावले. अजिंक्य रहाणेच्या खेळीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी त्याच्या या खेळीचे कौतुक केले आहे.
 
 
ऑस्ट्रेलियात शतक झळकवणारा पाचवा भारतीय कर्णधार
 
 
अजिंक्य रहाणेने मेलबर्न कसोटीत शतक करत एक खास विक्रम स्वत:च्या नावावर केला. ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा तो मोहम्मद अझरूद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली यांच्यानंतरचा पाचवा भारतीय कर्णधार ठरला आहे. तसेच अजिंक्यने मेलबर्न क्रिकेट मैदानावर झळकावलेले हे दुसरे शतक आहे. भारताकडून एमसीजीवर दोन शतक करणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. याआधी विनू मांकड यांनी अशी कामगिरी केली होती. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १९८५ नंतर प्रथमच असे घडले आहे की भारतीय संघाने पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात आघाडी आघाडी घेतली. एडिलेड कसोटीत भारताने पहिल्या डावात ५३ धावांची तर दुसऱ्या कसोटीत आतापर्यंत ८२ धावांची आघाडी घेतली आहे.
 
 
विराट कोहलीनेही केले रहाणेचे कौतुक
 
 
विराट कोहलीने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक ट्विट केले आहे. यामध्ये त्याने म्हंटले आहे की, "आपल्या भारतीय संघासाठी आणखी एक चांगला दिवस, कसोटी क्रिकेट सर्वोत्कृष्ट. नक्कीच अजिंक्य अशी टॉप फलंदाजी." विराट सध्या भारतात असला तरीही ट्विटरवरून वेळोवेळी त्याने भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121