बलूचिस्तान, पख्तुनिस्तान आणि सिंधमध्येही डोकवा

    14-Sep-2019
Total Views |


संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भारताचा पाकवर हल्ला


जिनिव्हा
: संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या परिषदेत (यूएनएचआरसी) काश्मिर मुद्द्यावर खोटारडे आरोप करणार्‍या पाकिस्तानवर भारताने जोरदार हल्लाबोल केला. पाकिस्तानने काश्मिरबाबत भ्रामक व तथ्यहीन वक्तव्ये करण्याऐवजी आपल्या ताब्यातील बलूचिस्ता, पख्तूनिस्तान, सिंध आणि अन्य भागांतील लोक अचानक कसे गायब होतात तसेच न्यायालयीन कोठडीतच अनेकांचे बळी कसे जातात, यावर लक्ष देण्याचा सल्ला यावेळी भारताने दिला. तत्पूर्वी पाकिस्तानने यूएनएचआरसीच्या ४२व्या अधिवेशनात काश्मिरवरुन लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला, परंतु, त्याला त्यात यश आले नाही.


संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या अधिवेशनाला संबोधित करताना भारताच्या सचिव कुमम मिनी देवी यांनी म्हटले की, पाकिस्तान तथ्यांची मोडतोड करुन मांडण्यात पटाईत असून त्याच चुका तो देश पुन्हा पुन्हा करत आहे. अर्थात त्याचेही आता आश्चर्य वाटत नाही. तरीही आम्ही पाकिस्तानला सांगू इच्छितो की, त्याने आधी पाकव्याप्त काश्मि, खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान आणि सिंधमध्ये गायब होणार्‍या तथा बळी जाणार्‍यां लोकांचा विचार करावा, त्यात लक्ष घालावे.


कुमम पुढे म्हणाल्या की, काश्मिरप्रकरणी पाकिस्तानने तयार केलेल्या खोट्या कहाण्यांनी वास्तव बदलू शकत नाही. कलम 370ला हटवणे भारताचा अंतर्गत विषय असून पाकिस्तान भारताविरोधात दहशतवादाला प्रायोजित करत आहे. परंतु, जम्मू-काश्मिरच्या लोकांनी भारताचे नागरिकत्व स्विकारत लोकशाहीवर विश्वास ठेवला व त्याला इतिहास साक्षी आहे. म्हणूनच ते तिथे होणार्‍या प्रत्येक निवडणूकीत सक्रियतेने सहभाग घेतात.


गो नियाझी गो बॅक


भारताने जम्मू-काश्मिरच्या अनुषंगाने कलम ३७० निष्प्रभावी करण्याचा आणि राज्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तान कमालीचा बिथरला तसेच पाकव्याप्त काश्मिर वाचवण्याची धडपड करु लागला. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान इमरान खान यांनी शुक्रवारी पाकव्याप्त काश्मिरच्या मुझफ्फराबाद येथे एका रॅलीचे आयोजन केले तसेच भारताविरोधात गरळ ओकली. परंतु, यावेळी स्थानिकांना भारताविरोधात भडकावण्याचा त्यांचा उद्योग सुरु असतानाच तिथे उपस्थित लोकांनी इमरान खान यांच्याविरोधातच गो नियाझी गो बॅकच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. इमरान खान यांच्याविरोधातील घोषणाबाजीची ही ध्वनिचित्रफित पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकेर्त आरिफ झकारिया यांनी ट्विट केले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121