नवी दिल्ली : अयोध्या-रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या मध्यस्थ समितीने गुरूवारी आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयास सुपूर्द केला. सीलबंद पाकिटातून हा अहवाल न्यायालयापुढे सादर करण्यात आला. या अहवालानंतर या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेले सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ शुक्रवार, दि. २ रोजी पुढील सुनावणी घेऊन अहवालावरील कारवाईविषयी पुढील निर्णय घेणार आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील व न्या. एस. ए. बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. ए. नझीर आदी सदस्य असलेले घटनापीठ आता शुक्रवार, दि. २ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी घेणार आहे. यावेळी मध्यस्थ समितीच्या अहवालाबाबत करावयाची पुढील कारवाई निश्चित करण्यात येणार आहे.