उर्मिला मातोंडकरच्या सभेत 'मोदी-मोदी'चा नारा...

    15-Apr-2019
Total Views |



मुंबई : उत्तर मुंबई मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या बोरिवली येथील सभेत काही तरुणांनी मोदी नावाचा जयजयकार केला. मातोंडकर यांची बोरिवली परिसरात प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती. ही प्रचार फेरी बोरिवली स्थानक परिसरात गेली असता काही तरुणांनी मोदी मोदीच्या घोषणांचा जयजयकार केला. यावेळी दोन्ही समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.

 

उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये भाजपचे गोपाळ शेट्टी आणि सिनेअभिनेत्री व काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यात सरळ लढत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून आरोपांच्या फैरी होत होत्या. मात्र, आज चक्क मातोंडकर यांच्या फेरीतच मोदी समर्थक घुसून मोदी मोदीच्या घोषणा दिल्या गेल्या. यावर चवताळलेल्या काँग्रेस समर्थकांनी दादागिरी करत मोदी समर्थकांना धक्काबुक्की करत मारहाण केली.

 

आपल्या प्रचार फेरीत घुसून भाजप गुंडानी धुडगूस घातल्याचा मातोंडकर यांनी आरोप केला आहे. घडलेल्या घटनेची पोलिसात तक्रारही दाखल त्यांनी संरक्षणाची मागणी केली आहे. दरम्यान, धुडगूस घालणारे मोदी समर्थक असू शकतात मात्र ते भाजपचे कार्यकर्ते नसल्याचे सांगत गोपाळ शेट्टी यांनी आरोप फेटाळले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121